HW News Marathi
राजकारण

राजीव गांधी यांच्या भारतरत्नवरुन आप’मध्ये वाद

नवी दिल्ली | दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींचा भारतरत्न काढून घेण्याचा प्रस्ताव दिल्ली विधानसभेत आप सरकारने मंजूर केला आहे. या वादादरम्यान आप नेत्या अलका लांबा यांची गच्छंती करण्यात आली आहे. लांबा यांच्याकडून राजीनामा घेण्यात आला आहे. त्यांचे पक्षातील सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. अलका लांबा यांनी संबंधित प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली. यामुळे लांबा यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी सोमनाथ भारती यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. सोमनाथ भारती यांना पार्टीच्या प्रवक्तेपदावर हटवण्यात आले आहे. संबंधित प्रस्ताव आपणच दिल्याचा दावा सोमनाथ भारती यांनी केला आहे. या प्रस्तावामध्ये राजीव गांधी यांचा भारतरत्न काढून घेण्याची मागणी करण्यात आली होती.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भाजप सध्या ‘भारतीय विरुद्ध काश्मिरी’ असा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्नात !

News Desk

रिपब्लिकन पक्षाला मिळणारे राज्यातील एक मंत्रिपद अविनाश महातेकर आणि भुपेश थुलकर यांना विभागून देणार

News Desk

एकनाथ शिंदेसह शिवसेनेचे नॉट रिचेबल आमदार गुजरातमधील मेरिडियन हॉटेलमध्ये मुक्कामी

Aprna