HW News Marathi
राजकारण

राजनाथ सिंग यांनी केला केजरीवाल यांना फोन

नवी दिल्ली | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मंगळवारी मिर्ची पूड फेकण्यात आली या प्रकरणी आरोपी अनिल कुमार याची दिल्ली पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या घटनेनंतर रात्री उशिरा गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केजरीवाल यांना फोन करून आरोपीविरूद्ध एफआयआर नोंदविण्याचा सल्ला केजरीवाल यांना दिला आहे.

याविषयीची माहिती आम आदमी पक्षाचे प्रवक्ते राघव चड्डा यांनी दिली आहे. राघव चड्डा यांनी सांगितले की मंगळवारी रात्री गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केजरीवाल यांना फोन करून हल्ल्याची माहिती घेतली तसेच विचारपूस केली. त्यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांना एफआयआर दाखल करण्यास सांगितले.

यानंतर चड्डा भाजपला लक्ष करत म्हणाले, ” उद्या जर पंतप्रधानांवर हल्ला झाला तर ते एफआयआर दाखल करणार काय?” जेव्हा गृहमंत्र्यांचा फोन आला तेव्हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात होता. “त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर जेव्हा सिग्नेचर ब्रिजवर हल्ला झाला तेव्हा या प्रकरणाबाबत मुख्यमंत्र्यांविरोधात एफआयआर नोंदविण्यात आले आहे. यासह राघव म्हणाले, की चार्जशीट फाइल आहे आणि जर मला कोर्टात बोलावले गेले तर मी प्रत्यक्षदर्शी बनेन. हा भाजपचा हल्ला कोणत्याही एका व्यक्तीवर नव्हे तर दिल्लीच्या जनतेवर आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

उद्धव ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरेंच्या वैचारिक विचारसरणीचे! – प्रकाश आंबेडकर

Aprna

भाजपासारखे आकडे फेकायला आपण काय रतन खत्री आहोत काय? | राज ठाकरे

News Desk

गुजरातमध्ये मुस्लिमांची परिस्थिती इतर राज्यांपेक्षा खूप चांगली !

News Desk