HW News Marathi
राजकारण

आता राम मंदिरचे कार्य पूर्ण होणार, मोहन भागवत यांचा विश्वास

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राम मंदिर पूर्ण होण्याची असा विश्वास सरसंघाचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. भागवत यांनी उदयपूरमध्ये आयोजित रामकथा कार्यक्रमात बोलतना म्हणाले. गेल्या पाच वर्षात आरएसएसने भाजपवर राम मंदिर बाबत दबाव टाकला होता. राम मंदिराचा विषय न्यायालयीन प्रकरण असल्याचे सांगत भाजपने लांब राहणे पसंद केले.

भाजपने २०१९ च्या जाहीरनाम्यातही न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून केंद्र सरकार राम मंदिर निर्माणासाठी आवश्यक असणारे निर्णय घेईल, असे आश्वासन दिले आहे. वादग्रस्त जमिनीच्या आसपास जवळपास ६७ एकर जमीन आहे. त्याबदद्ल कसलाही तंटाबखेडा नाही. ती मूळ मालकांना परत करण्याची परवानगी मिळावी, अशी याचिका केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्यामुळे किमान मंदिरनिर्मितीसाठी आवश्यक अशी तयारी या परिसरात नक्कीच करता येऊ शकते.

अयोध्या प्रकरणाची सुनावणी तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. १५ ऑगस्टनंतर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. मध्यस्थांच्या त्रिसदस्यीय समितीने सीलबंद अहवाल सर्वोच्च न्यायालय सादर केल्यानंतर हा निर्णय दिला होता. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या विहिंपच्या धर्मसंसदेत मोहन भागवतांनी राम मंदिरावर बोलणे टाळले होते. तर गेल्या वर्षी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका विराट हिंदू सभेमध्ये, राम मंदिराच्या निर्माणासाठी आता कोणतीही तडजोड चालणार नाही, असा आक्रमक पवित्रा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी घेतला होता.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्रकांत पाटलांनी दिले रामदास कदमांना तिळगूळ

News Desk

जे दोषी असतील त्यांच्यावरच कारवाई होणार !

News Desk

#LokSabhaElections2019 : काँग्रेसचे महाराष्ट्रातील ५ उमेदवार जाहीर

News Desk