HW News Marathi
राजकारण

जावई पडल्याचे दुःख नाही तेवढे दुःख चंद्रकांत खैरे पडल्याचे आहे !

मुंबई | औरंगाबाद मतदारसंघात लोकसभेतील शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना त्यांच्या ३१ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदाच पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष आणि जालना मतदारसंघाचे भाजपचे विजयी उमेदवार रावसाहेब दानवे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “मला माझे जावई पडल्याचे जेवढे दु:ख नाही, तेवढे दु:ख चंद्रकांत खैरे पडल्याचे आहे”, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.

“मला माझे जावई पडल्याचे जेवढे दुःख नाही तेवढे चंद्रकांत खैरे पडल्याचे दुःख वाटते”, असे रावसाहेब दानवे म्हणाले. “मी स्वतः म्हटले होते की चंद्रकांत खैरे निवडून येतील. मात्र, काही राजकीय गणिते चुकीची निघतात”, असेही रावसाहेब दानवे यावेळी म्हणाले. औरंगाबाद मतदारसंघातून झालेल्या चंद्रक्रांत खैरे यांच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे बोलत होते.

जालना मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांचा तब्बल १ लाख २८ हजार १४० मतांनी विजय झाला. यावर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले कि, “आम्ही प्रथम सरकार स्थापन करणार आणि त्यानंतर विधानसभेच्या तयारीला लागणार. मात्र, काँग्रेसला आता राज्यात एकही उमेदवार मिळणार नाही. राज्यात उमेदवार मिळावा म्हणून त्यांना जाहिरात द्यावी लागेल”, असा टोला देखील दानवे यांनी काँग्रेसला लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्राच्या कामगारविरोधी धोरणाविरोधात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

News Desk

लोकसभेतील खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Aprna

‘शिवाजी पार्क’वरील दसरा मेळाव्याच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज होणार सुनावणी

Aprna