HW News Marathi
राजकारण

साध्वी प्रज्ञा सिंहचे प्रायश्चित, पाळणार २१ तास मौन

नवी दिल्ली | मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भाजपकडून भोपाळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा देशभक्त म्हटले होते. या विधानानंतर प्रज्ञा सिंह यांचे हे व्यक्तीगत मत असल्याचे म्हटले असून प्रज्ञा सिंह यांनी याबद्दल जाहीर माफी मागवी असे भाजपने म्हणाले होते. पंतप्रधान मोदी यांनी या वक्तव्यावरून साध्वींना कधीच मनापासून माफ करणार नाही असे म्हटले होते. यानंतर प्रज्ञा सिंहने माफी मागत २१ तास मौन व्रत पाळणार आहे, असे ट्वीट तिने केले आहे.

मतदान पार पडल्यानंतर आता चिंतन करण्याची वेळी आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान जर माझ्या शब्दांनी देशभक्तांना दु:ख झाले असेल तर मी सर्वांची माफी मागते. तसेच दैनंदिन सार्वजनिक जीवनातील मर्यादा अंतर्गत प्रायश्चित म्हणून मी २१ तास मैन पाळणार आहे, असे ट्वीट साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केले आहे. ”नथुराम गोडसे हा देशभक्त होता, देशभक्त आहे आणि देशभक्त राहील,” असे वादग्रस्त विधान प्रज्ञा सिंह यांनी १६ मे रोजी एका मालवाड जिल्ह्यातील एका रोड शोदरम्यान प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.

तसेच साध्वी प्रज्ञा सिंह यांनी यापूर्वी वादग्रस्त वक्तव्य केले होते. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यावेळी शहीद झालेले एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांचा मृत्यू आपण दिलेल्या शापामुळे झाला, असा दावा प्रज्ञा सिंह यांनी केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने भोसरी MIDC मधील धक्कादायक प्रकार आणला उघडकीस

News Desk

मी आता निवडणुक लढणार नाही। चंद्रकांत पाटील

News Desk

गडचिरोलीमधील एटापल्ली मतदान केंद्राजवळ आयडी स्फोट

News Desk