HW News Marathi
राजकारण

संभाजी भिडे यांना जामीन मंजूर

नाशिक | शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांना आज नाशिक येथील न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. संभाजी भिडे यांच्यावर त्यांच्या वादग्रस्त विधानाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. “माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना मुले होतात”, असे वादग्रस्त वक्तव्य नाशिक येथे झालेल्या एका आयोजित सभेत संभाजी भिडे यांनी केले होते. संभाजी भिडे यांच्या या वादग्रस्त वक्तव्याविरोधात ‘लेक लाडकी अभियान’ या संस्थेने पुण्यातील आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकांकडे तक्रार दाखल केली होती.

नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने या तक्रारीची दखल घेत याबाबतची चौकशी करून संभाजी भिडेंच्या विरोधात जिल्हा न्यायालयामध्ये दावा दाखल केला होता. दरम्यान, दावा दाखल होऊन समन्स बजावूनही संभाजी भिडे तीन वेळा न्यायालयासमोर उपस्थित राहिले नाहीत. त्यानंतर न्यायालयाने पंधरा हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्‍यावर संभाजी भिडे यांना जामीन मंजूर केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शरद पवार जर या देशाचे पंतप्रधान झाले तर देश विकायला काढतील !

News Desk

उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह मध्य प्रदेशात देखील बसपा-सपा यांची आघाडी

News Desk

दिल्लीत ‘अशा’ भेटीगाठी होतच राहतात !

News Desk
क्राइम

संघ मुख्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

News Desk

नागपूर : रॉकेलची बाटली हातात घेऊन एका युवकाने महालमधील शनिवारी सायंकाळी संघ मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. वेळीचसीआयएसएफच्या जवांनानी त्याला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. बेरोजगारीला कंटाळून हा युवक संघ मुख्यालयासमोर आत्मदहनकरण्याच्या प्रयत्नात होता, असे सांगण्यात येते. या घटनेची नोंद कोतवाली पोलिसांनी केली असून, त्याला नातेवाईकांच्या स्वाधीन केलेआहे. संतोष, असे या युवकाचे नाव आहे.

संतोष हा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. तो बीटेक झाला आहे. उच्च शिक्षित असतानाही त्याला नोकरी मिळाली नाही. त्यानेतेथील प्रशासनाला वेळोवेळी नोकरी मिळण्याबाबत विनवणी केली. त्याला कोणीही दाद दिली नाही. त्यामुळे तो हताश झाला होता.

‘मी उच्च शिक्षत आहे, मला नोकरी मिळत नाही. उत्तर प्रदेश प्रशासन मला न्याय देत नाही, संघ मुख्यालयात मला न्यायमिळेल, या मुळे मी येथे आलो आहे’,असे तो सांगत होता. सीआयएसएफच्या जवानांनी कोतवाली पोलिसांना माहिती दिली.

Related posts

दरोडेखोरांकडून बँक अधिकाऱ्यासह पत्नीचा खून; दोन मुली जखमी

News Desk

नक्षल्यांनी केली पंचायत समितीच्या कंत्राटी कर्मचाऱ्याची हत्या

News Desk

गटविकास अधिकारी लाच घेताना रंगेहात अटक

News Desk