HW News Marathi
राजकारण

बीजेपी से बेटी बचाओ

मुंबई | देशात बलात्कारच्या घटना अतिशय गंभीर झाल्या आहेत. या प्रकारणांवर बोलताना कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले, हल्लीच कश्मीरच्या कठुआ गावात ८ वर्षाच्या चिमुरडीवर झालेला सामुहीक बलात्कार आणि हत्या हे प्रकरण मन हेलावून टाकणारे होते.

परंतु सरकार कडून कोणत्याही प्रकारचे गंभीर पाऊल उचलले गेले नाही. कारण मुलींच्या लैंगिक शोषणामध्ये भाजपचे आमदाराच गुंतलेले आहेत. त्यामुळे बीजेपी से बेटी बचाओ असे म्हणाची वेळ आली असल्याची टिका अशोक चव्हाण यांनी भाजपावर केली.

भाजप सरकारला कृती करायला किंवा पंतप्रधानांना मुलींवर होणा-या आत्याचारावर भाष्य करायला ११ ते १२ दिवस जाऊ द्यावे लागतात ही बाब अत्यंत निंदनीय आहे. जे सरकार बेटी बचाव बेटी पढाव सारखे उपक्रम राबवत आहे त्यांच्यापासूनच मुलींना वाचविण्याची वेळ सामान्य माणसावर आलेली आहे असेही ते यावेळी म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाणून घ्या…प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांच्या वादामागचे नेमके कारण काय?

News Desk

नरेंद्र मोदींचे पंतप्रधान पद जाणार !

Gauri Tilekar

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात !

News Desk