HW News Marathi
राजकारण

बीजेपी से बेटी बचाओ

मुंबई | देशात बलात्कारच्या घटना अतिशय गंभीर झाल्या आहेत. या प्रकारणांवर बोलताना कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले, हल्लीच कश्मीरच्या कठुआ गावात ८ वर्षाच्या चिमुरडीवर झालेला सामुहीक बलात्कार आणि हत्या हे प्रकरण मन हेलावून टाकणारे होते.

परंतु सरकार कडून कोणत्याही प्रकारचे गंभीर पाऊल उचलले गेले नाही. कारण मुलींच्या लैंगिक शोषणामध्ये भाजपचे आमदाराच गुंतलेले आहेत. त्यामुळे बीजेपी से बेटी बचाओ असे म्हणाची वेळ आली असल्याची टिका अशोक चव्हाण यांनी भाजपावर केली.

भाजप सरकारला कृती करायला किंवा पंतप्रधानांना मुलींवर होणा-या आत्याचारावर भाष्य करायला ११ ते १२ दिवस जाऊ द्यावे लागतात ही बाब अत्यंत निंदनीय आहे. जे सरकार बेटी बचाव बेटी पढाव सारखे उपक्रम राबवत आहे त्यांच्यापासूनच मुलींना वाचविण्याची वेळ सामान्य माणसावर आलेली आहे असेही ते यावेळी म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बाळासाहेब ठाकरेंनी देखील राज्यसभेसाठी ऑफर दिली होती | कुमार केतकर

News Desk

पद्मश्री आचरेकरांना शासकीय इतमामात निरोप न दिल्याने सरकारचा कोतेपणा उघड !

News Desk

काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर राहुल गांधींचा राजीनाम्याचा प्रस्ताव ?

News Desk
महाराष्ट्र

नाणार प्रकल्पग्रस्तांनी घेतली अशोक चव्हाणांची भेट

News Desk

मुंबई | विनाशकारी रिफायनरी विरोधीसंघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांच्या नेतृत्वाखाली कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने शनिवार 14 एप्रिल रोजी टिळक भवन दादर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदर अशोक चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली. नाणार परिसरात होऊ घातलेल्या रिफायनरी विरोधात सध्या ही संघर्ष समीती महत्वाच्या नेत्यांची भेट घेत आहे.

यावेळी कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष समितीच्या कार्यकर्ते सदस्य आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना खासदार अशोक चव्हाण म्हणाले, लोकांची घरे दारे उध्वस्त करून त्यांच्या पुनर्वसनाचा विचार न करता हा प्रकल्प होणे हे आम्हाला कधीच मान्य होणार नाही. लोकांचे प्रश्न मार्गी लावा आणि मगच पुढचे पाऊल टाका असा सल्ला यावेळी बोलताना चव्हाण यांनी भाजप सरकारला दिला. २० एप्रिल रोजी काँग्रेसचे शिष्ट मंडळ नाणारला जाणार असून प्रकल्पग्रस्तांची भेट घेणार आहे. आंदोलनात लोकांसोबत राहण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली आहे.

Related posts

निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यासाठी सविस्तर पंचनामे करण्याचे आदेश

News Desk

नाशिक निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी भाजपने स्थायी सदस्य पाठवले सहलीला!

News Desk

कंगणाला महाराष्ट्रात आणि मुंबईत राहण्यातच अधिकार नाही – गृहमंत्री

News Desk