HW News Marathi
राजकारण

शहा, उद्धव बैठक अखेर संपली, दोन तास झाली दोघांमध्ये चर्चा

मुंबई | तब्बल दोन तास झालेल्या चर्चेनंतर अमित शाह-उद्धव ठाकरे यांच्यातील बैठक साडे नऊच्या सुमारास संपली. यावेळी त्यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. बाळासाहेब ठाकरे यांचे जेथे अखेरपर्यंत वास्तव्य होते, त्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यामध्ये गुप्त चर्चा झाली. उद्धव ठाकरे-अमित शाह वगळता त्यावेळी त्यांच्यासोबत कोणीही नव्हते.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियानातंर्गत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली असल्याचे सांगण्यात आले असले तरीही आगामी निवडणुकीच्या दृष्टीने ही भेट महत्वपुर्ण समजली जात होती. बंद दाराआड ठाकरे आणि शाह यांच्यात चर्चा सुरु असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या चर्चेपासून दूर ठेवण्यात आले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये विविध विषयांवर प्रदीर्घ चर्चा झाली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची भेट होत असल्याने प्रसारमाध्यमांमध्ये या भेटीविषयी प्रचंड उत्सुकता होती.

सायंकाळी पावणे आठच्या दरम्यान अमित शहा मातोश्रीवर दाखल झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. दोघांमधील प्रदीर्घ चर्चेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही बैठकीत सहभागी झाले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

HW Exclusive | पक्ष न्याय देईलच, आमच्या पक्षाचं धोरण जरा वेगळं आहे !

News Desk

“मर्यादा ओलांडून काही होत असेल, तर ते राज्याच्या दृष्टीने चांगले नाही”, पवारांचा शिंदे-ठाकरे गटांना सल्ला

Aprna

शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात उदयनराजे भोसले अनुपस्थित; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna
राजकारण

शिवसेना आमदार विजय औटी यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड

News Desk

मुंबई | विधानसभेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेचे आमदार विजय औटी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांपासून हे पद रिक्त होते. विधानसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतून काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे आमदार विजय औटी यांची बिनविरोध निवड झाली आहे.

सध्या विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे हरिभाऊ बागडे आहेत. विधानसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे २९ नोव्हेंबरला सकाळी ११.४५ वाजेपर्यंत विधानमंडळाच्या प्रधान सचिव यांच्या दालनात सादर करण्यास सांगितले होते. यावेळी शिवसेनेचे विजय औटी, काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांचे अर्ज दाखल करण्यात आले होते.

Related posts

अर्थसंकल्पात महिलांसाठी ‘या’ आहेत मोठ्या घोषणा

Aprna

“…सत्तेशिवाय समोरासमोर या”, संजय राऊतांचे शिंदे गटाला आव्हान

Aprna

Shekhar Gore Exclusive | मला आताच आमदार झाल्यासारखं वाटतंय !

News Desk