HW News Marathi
राजकारण

संकट आलं म्हणजे नाउमेद व्हायचं नसतं ! 

सातारा । गेले अनेक महिने देशात केवळ लोकसभा निवडकीचा ज्वर आहे. देशभरात ७ टप्प्यात झालेली लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर निकालाची प्रतिक्षा. या संपूर्ण पार्श्वभूमीवर राज्यातील भीषण दुष्काळकडे दुर्लक्ष झाले. मात्र, आता निवडणुकांच्या निकालानंतर पुन्हा एकदा राज्यातील नेत्यांनी या समस्येकडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे. “संकट आलं म्हणजे नाउमेद व्हायचं नसतं, संकटाने खचून जायचं नसतं”, असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी राज्यातील दुष्काळग्रस्तांना या धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

शरद पवार यांनी साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडी आणि नागेवाडी या गावांना भेट दिली. यावेळी ते बोलत होते. “संकट आलं म्हणजे काय नाउमेद व्हायचं नसतं, संकटाने खचून जायचं नसतं. संपूर्ण महाराष्ट्रात आज भीषण दुष्काळी परिस्थिती आहे, काळ कठीण आहे. मात्र आपण हरायचं नाही. या संबंधी आपण राज्य शासनाकडू मदत घेऊन पुन्हा हे संकट येणार नाही यासाठी प्रयत्न करू”, असे शरद पवार यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पीएम मोदींच्या ‘एअर स्ट्राईक’मुळे विरोधकांच्या महागाई, बेरोजगारीसह राफेल घोटाळ्यांवर ‘बॉम्ब’ पडला

News Desk

शिवसेनेशिवाय कोणीही सत्ता स्थापन करू शकणार नाही !

News Desk

सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, तर गरिबांना महिन्याला ६००० देणार !

News Desk