HW News Marathi
राजकारण

अखेर शरद यादव यांनी वसुंधरा राजेंची माफी मागितली

जयपूर | ‘वसुंधरा राजे यांचे आणि माझे जुने कौटुंबिक संबंध आहेत. माझ्या विधानामुळे जर त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो. मी त्यांना याबाबत पत्र देखील लिहिणार आहे’, असे जनता दलाचे प्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांनी म्हटले आहे. राजस्थानमधील अलवर येथे निवडणुकांच्या प्रचारादरम्यान शरद यादव यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे याच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते.

‘राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे खूप थकल्या आहेत, जाड झाल्या आहेत. आता त्यांना आराम द्यायला हवा’, असे विधान निवडणुकांच्या प्रचारादरम्यान शरद यादव यांनी केले होते. त्यांचे हे विधान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल देखील झाले होते. त्यामुळे शरद यादव यांच्यावर सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणावर टीका झाली.

‘शरद यादव यांच्या विधानामुळे मला धक्का बसला आहे. इतका मोठ्या नेत्याला आपल्या जीभेवर संयम ठेवता आला नाही, याचे दुःख वाटते. निवडणूक आयोगाने या प्रकाराची दखल घ्यावी जेणेकरून यापुढे अशा घटना घडू नयेत. शरद यादव यांनी असे विधान करून माझा अपमान केला आहे. हा केवळ माझा नव्हे तर संपूर्ण महिलावर्गाचा अपमान आहे’ असे म्हणत वसुंधरा राजेंनी शरद यादव यांचा खरपूस समाचार घेतला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#LokSabhaElections2019 : भारिप बहुजन महासंघ वंचित आघाडीत विलीन करणार !

News Desk

पद्मश्री आचरेकरांना शासकीय इतमामात निरोप न दिल्याने सरकारचा कोतेपणा उघड !

News Desk

काँग्रेस मोदींच्या बापाची मालमत्ता नाही, काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

News Desk