HW News Marathi
राजकारण

शिवसेना-भाजपची युती तुटणार ?

मुंबई | अडीच वर्षे शिवसेना तर अडीच वर्षे भाजपचा मुख्यमंत्री असेल ही अट मान्य झाल्यानंतरच युतीचा निर्णय घेतला गेला आहे, अशी माहिती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी एका मराठी वृत्तवहिनीला दिली आहे. “अडीच-अडीच वर्षांची अट ही माझी आणि पक्षाची दोघांची आहे. तसे झाले नाही तर आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगून ही युती रद्द करायला लावू”, असे विधान रामदास कदम यांनी या वृत्तवाहिनीशी बोलताना केले आहे.

शिवसेना-भाजप यांच्या सोमवारी (१८ फेब्रुवारी) झालेल्या युतीबाबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा झाल्यानंतर एच.डब्ल्यू.मराठीने शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्यासाठी संवाद साधला होता. यावेळी मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न विचारल्यानंतर मनोहर जोशी यांनी “ज्या पक्षाच्या जास्त जागा निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल” असे सांगण्यात आले होते. इतकेच नव्हे तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील “मुख्यमंत्री आमचाच असेल”, असे विधान अनेकदा केले आहे. शिवसेनेच्याच २ नेत्यांची युतीची बाबतची ही विरोधाभासी विधाने पाहता निर्णय नेमका काय आहे ? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

रामदास कदम यांनी यावेळी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा देखील उल्लेख केला आहे. “मी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची मुलाखत पाहिली. यावेळी ते म्हणाले कि, विधानसभा निवडणुकीत ज्यांच्या जास्त जागा येतील, त्यांचा मुख्यमंत्री येईल. मात्र त्यांचे म्हणणे साफ चुकीचे आहे. चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याशी चर्चा करून बोलावे. नाहीतर असे होईल की युती झाली मात्र काहीतरी उलटसुलट वक्तव्यांमुळे पुन्हा युती तुटली” असेही रामदास कदम म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“रडायचे नाही तर लढायचे…”, संजय राऊतांनी पत्राद्वारे मित्रपक्षांचे मानले आभार

Aprna

बसपऐवजी चुकून भाजपला मत दिले म्हणून चक्क स्वतःचे बोटच कापले

News Desk

काश्मीरमध्ये कधी येऊ सांगा, राहुल गांधींचा सत्यपाल मलिक यांना सवाल

News Desk