HW News Marathi
राजकारण

#PulwamaAttack : देशात निर्माण झालेल्या एकतेला मतांमध्ये रूपांतरित करा !

नवी दिल्ली | “पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशात निर्माण झालेल्या एकतेला मतांमध्ये रूपांतरित करण्याची जबाबदारी तुमची आहे”, असे वादग्रस्त विधान गुजरातमधील भाजप नेते भरत पंड्या यांनी केले आहे. भाजपच्या कार्यकर्ता संवाद शिबिरामध्ये सोमवारी (१८ फेब्रुवारी) पंड्या बोलत होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधताना हे वक्तव्य केले आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेल्या भीषण हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भरत पंड्या यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यावरून मोठा वाद पेटण्याची शक्यता आहे.

“पुलवामा हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानवर काय कारवाई केली जाणार ? याकडे लोकांचे लक्ष आहे. देशात आज हीच भावना आहे. देशासाठी सर्वजण त्यांच्यातील मतभेद दूर करून एकत्र आलेत. संपूर्ण देश देशभक्तीच्या भावनेत आहे. आगामी निवडणुकांसाठी याचा उपयोग करा”, असे आदेश पंड्या यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. इतकेच नाही तर पंड्या यांनी उलट आपल्या कार्यकर्त्यांनाच सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उर्मिला मातोंडकर यांनी केला काँग्रेसला राम राम

News Desk

शिवसेनेचे सर्व मंत्री भाजपला सामील, सेनेच्या आमदाराचा मंत्र्यांवर आरोप

News Desk

आपण एकत्र राहिलो तर भाजपचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही !

News Desk