HW News Marathi
राजकारण

“…मग हे संकट काहीच नाही,” उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारला टोला

मुंबई | “कोरोना काळात मुकाबला केला, मग हे संकट काहीच नाही,” असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. उद्धव ठाकरे हे आज (23 ऑगस्ट) विधानभवनात केले होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना राज्यातील सत्तांतर आणि शिंदे सरकारवर तोफ डागली.

 

उद्धव ठाकरे म्हणाले, “महाविकास आघाडी म्हणून आम्ही कोरोना काळामध्ये त्या संकटाचा मुकाबला केला. तर हे संकट काय आहे. तेव्हा तर ते जगावर आलेले संकट होते. कोणाला काही कळत नव्हते, पण त्याचा मुकबला महाविकास आघाडी सरकारने एक महाराष्ट्रला दिलासा देणे महाराष्ट्रामध्ये आरोग्य सुविधा वाढवणे. त्या चांगल्या देणे, अशा पद्धतीने एक चांगला, त्याचा मुकाबला आम्ही केला. त्या संकटापुढे हे संकट काहीच नाही. आम्ही कुठेही फुटलेलो नाहीये, आम्ही सर्व जण एकत्र आहोत.”

 

पत्रकारांनी राज्यातील सत्तांतरावर उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “त्यामुळे पुढे काय करायचे, जेव्हा कराय, तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. दोन गोष्टी मी याबाबती सांगू इच्छितो. न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते, याचा कारण कायद्यासमोर सर्व सारखे असतात. पण त्याच वेळेला जनता उघड्या डोळ्याने बघत असते. न्यायदेवता आणि जनता हे लोकशाहीचे आधारस्तंभ आपल्या देशात मजबूत आहेत. तोपर्यंत या देशामध्ये लोकशाहीच राहिल.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अयोध्येत आता मांस आणि दारूबंदी ?

swarit

पंतप्रधान मोदी आज अयोध्येत, धार्मिक स्थळांपासून दूर राहण्याची शक्यता

News Desk

‘मविआ’ सरकार टिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार! – अजित पवार

Aprna