HW News Marathi
राजकारण

शिवसेना आमदार विजय औटी यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड

मुंबई | विधानसभेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेचे आमदार विजय औटी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांपासून हे पद रिक्त होते. विधानसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतून काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे आमदार विजय औटी यांची बिनविरोध निवड झाली आहे.

सध्या विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे हरिभाऊ बागडे आहेत. विधानसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे २९ नोव्हेंबरला सकाळी ११.४५ वाजेपर्यंत विधानमंडळाच्या प्रधान सचिव यांच्या दालनात सादर करण्यास सांगितले होते. यावेळी शिवसेनेचे विजय औटी, काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांचे अर्ज दाखल करण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

यंदा काम करणाऱ्याला मत द्या, नाचणाऱ्याला देऊ नका !

News Desk

राफेलबाबतच्या निर्णयाचे राम मंदिर कनेक्शन

News Desk

हा कसा निवडून येतो तेच मी बघतो !

News Desk
राजकारण

अखेर नोटबंदीच्या निर्णयाबाबत अरविंद सुब्रमण्यम यांनी सोडले मौन

News Desk

नवी दिल्ली | नोटबंदीच्या निर्णयाबाबत मोदी सरकारचे माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी अखेर मौन सोडले आहे. नोटबंदी हा सरकारचा क्रूर निर्णय असून नोटाबंदीमुळे देशाचा आर्थिक विकास मंदावला आहे, अशा शब्दात अरविंद सुब्रमण्यम यांनी मोदी सरकारला फटकारले आहे. ‘ऑफ काउंसिल: द चॅलेंजेस ऑफ द मोदी-जेटली इकॉनॉमी’ या पुस्तकात त्यांनी हा उल्लेख केला आहे.

‘५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद केल्यानं भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा हादरा बसला होता. त्यामुळं आर्थिक विकासदर आठ टक्क्यांवरून ६.८ टक्क्यांच्या निचांकीवर पोहोचला. एकाच झटक्यात ८६ टक्के चलन हे कागदाचे तुकडे झाले. त्याचा सर्वाधिक फटका असंघटित क्षेत्राला बसला’, असे त्यांनी पुस्तकात म्हटले आहे. अरविंद सुब्रमण्यन हे नोटाबंदीच्या वेळी मोदी सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार होते.

सुब्रमण्यन यांच्या दाव्याचा आधार घेत काँग्रेससह विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. दरम्यान, माजी मुख्य आर्थिक सल्लागारांनी अखेर नोटाबंदीमागील सत्य उघड केले आहे, असे म्हणत विरोधीपक्षांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

Related posts

“विरोधी पक्षाविरोधात मोठे कारस्थान किंवा डाव रचला जात आहे का?”, संजय राऊतांचा राज्य सरकारला सवाल

Aprna

शरद पवारांची मानसिकता राजेशाही, आम्ही मात्र जनतेचे सेवक !

News Desk

राहुल गांधींनी मागितली सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी

News Desk