HW News Marathi
राजकारण

सोमनाथ चटर्जींच्या निधनाने संसदीय राजकारणातील तपस्वी नेता हरपला

मुंबई | लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चटर्जी हे उत्कृष्ट संसदपटू , प्रभावी वक्ते, विचारवंत , तथा सर्वपक्षांत लोकप्रिय आदरणीय विश्वसनीय व्यक्तीमत्वाचे ज्येष्ठ नेते होते त्यांच्या निधनामुळे संसदीय राजकारणातील तपस्वी नेता हरपला आहे अश्या शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिवंगत सोमनाथ चटर्जी यांना आदरांजली वाहिली आहे.

लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि कम्युनिस्ट पक्षाचे माजी नेते दिवंगत सोमनाथ चटर्जी यांची महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर श्रद्धा होती. ते नेहमी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आणि आंबेडकरी चळवळीचा आदर करीत. शोषित वंचित समाज घटकांच्या संघर्षाला ताकद देण्याचे त्यांचे धोरण होते.त्यांच्या सोबत माझे घनिष्ठ संबंध होते. दिवंगत सोमनाथ चटर्जी स्वतः 10 वेळा लोकसभा निवडणूक जिंकले आहेत.

सन 2004 ते 2009 या कालखंडात दिवंगत सोमनाथ चटर्जी हे लोकसभा अध्यक्ष असताना मला लोकसभेत सर्वाधिक वेळ चर्चेत सहभागी होता आले तसेच सर्वाधिक वेळ लोकसभा कामकाजात भाग घेणारा आणि विविध सामाजिक राष्ट्रीय प्रश्न लोकसभेत मांडणारा उत्कृष्ट खासदारपदाचा मान मला सोमनाथ चटर्जी यांच्या लोकसभा अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत मिळाल्याची आठवण सांगून ना रामदास आठवलेंनी दिवंगत सोमनाथ चटर्जी यांच्या आठवणींना उजाळा दिला. दिवंगत सोमनाथ चॅटरजींच्या सोबत रामदास आठवलेंनी प्रवास केल्याच्या आठवणीही ताज्या झाल्याचे ते म्हणाले.

रिपब्लिकन पक्ष आणि आंबेडकरी चळवळीबद्दल त्यांना आस्था सहानुभूती होती. लोकसभा अध्यक्ष म्हणून दिवंगत सोमनाथ चटर्जी यांनी सर्व पक्षांचा विश्वास संपादन करून संसदीय राजकारणाला नवी दिशा दिली. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा प्रतिमा कायम उज्वल राहिली त्यांच्या कर्तुत्वाला देशाची जनता कायम नमन करीत राहील असे सांगत रामदास आठवलेंनी दिवंगत सोमनाथ चटर्जीना आदरांजली वाहिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मी माझ्या घरातील मुलांचे बालहट्ट पुरवणार, दुसऱ्यांचे कशाला!

News Desk

#LokSabhaElections2019 : आज होणार महाआघाडीची अधिकृत घोषणा

News Desk

हा तर भाजपचा पराभव – उद्धव ठाकरे

News Desk
देश / विदेश

देशात अतिवृष्टीमुळे नागरीकांचे हाल

News Desk

नवी दिल्ली | यंदाच्या पावसाळ्यात सात राज्यांत निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे तब्बल ७७४ जणांचा मृत्यु झाल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. गृहमंत्रालयाच्या राष्ट्रीय आणीबाणी प्रतिसाद केंद्राच्या (एनईआरसी) मते, केरळमध्ये १८७ जणांनी तर, उत्तर प्रदेशमध्ये १७१, पश्चिम बंगालमध्ये १७० आणि महाराष्ट्रात १३९ जणांनी यंदाच्या पावसाळ्यात पूर्वपरिस्थितीमुळे आपला जीव गमावला आहे. तसेच गुजरातमध्ये ५१, आसाममध्ये ४५ तर नागालँडमध्ये ८ जणांनी आपला जीव गमावला आहे.

केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये एकूण २७ नागरीक अजून बेपत्ता आहेत, तर राज्यात एकूण २४५ जण जखमी आहेत. महारष्ट्रातील एकूण २६ , तर केरळमधील १४, उत्तर प्रदेशमधील १२, आसाममधील २३, पश्चिम बंगालमधील २२, नागालँडमध्ये ११ तर गुजरातमधील १० जिल्ह्यांना यंदाच्या अतिवृष्टीचा आणि महापुराचा तडाखा बसला आहे. लॉंगढांगमध्ये रात्री उशिरा पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे उत्तराखंडमधील बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग रात्रीपासून बंद करण्यात आला असून स्थानिक प्रशासनाद्वारे या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम चालू झाले.

 

Related posts

कश्मीरमध्ये १३ दहशतवाद्यांना कंठस्नान, ३ जवान शहीद

News Desk

१८० शेतकरी संघटना आंदोलनाच्या तयारीत

News Desk

आज नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात राज्यासह देशभरात आंदोलन

News Desk