HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

गुलाबराव पाटील यांच्या ‘या’ वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुंबई | “आम्ही मंत्रीपदाचा सट्टा लावूनचा शिंदेंबरोबर जाण्याचा निर्णय घेतला”, असे वक्तव्य राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केले आहे. गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा विषय झाले आहे. जळगाव (Jalgaon) ग्रामीण मतदारसंघातील भोरखेडा येथील विविध योजनांच्या लोकार्पण सोहळ्यानंतर गुलाबराव पाटील बोलताना हे विधान केले.

गुलाबराव पाटील म्हणाले, “उद्धव ठाकरेंना शिवसेनेतून बाहेर पडण्यापूर्वी तुम्ही चुकीच्या मार्गाने जात असल्याचे आपण त्यांना सांगितले होते. परंतु, संजय राऊत यावर म्हणाले, जायचे तर जाऊदे. आपणही बाळासाहेबांचे विचार असलेल्या आणि मराठी चेहरा असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे जाण्याचा निर्णय घेतला. सरपंच पदाचा राजीनामा देताना लोक विचार करतात. आम्ही तर आठ मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. बहुमताचा आकडा जमला नसता तर आम्ही मंत्रीपदाचा सट्टा लावून शिंदेंबरोबर जाण्याचा निर्णय घेतला.”

गेल्या सात महिन्यात एकनाथ शिंदे हे पाच वेळा जळगाव जिल्ह्यात आले आहेत. असा मुख्ममंत्री कुठेही सापडणार नाही. पण, आतापर्यंत त्यांच्याबरोबर होतो. तर चांगला होतो. एकदम बिघडून गेलो. पश्चिम बंगालमध्ये सापडलेले २७ कोटी सापडले होते. ते आणण्यासाठी एक ट्रक लागला. मग, ५० कोटी आणण्यासाठी एक ट्रक लागले असते ना”, असा सवाल ठाकरे गटावर गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप नेते किरीट सोमय्या यांना पोलीसांनी घेतले ताब्यात

News Desk

विधानभवनाच्या पायऱ्यावर ‘शीर्षासन’ करून भुरळ पडणारे आमदार संजय दौंड यांचा फिटनेस फंडा

Aprna

शेतकरी आंदोलनाला ‘पब्लिसिटी स्टंट’ म्हणणाऱ्या आठवलेंनी शेतकऱ्यांची माफी मागावी,राष्ट्रवादीच्या मागणी!

News Desk