HW News Marathi
राजकारण

सुखबीर सिंग बादल यांना विचारांची बद्धकोष्ठता । नवज्योतसिंग सिद्धू

नवी दिल्ली ।“सुखबीर सिंग बादल यांना विचारांची बद्धकोष्ठता झाली असेल तर त्यात माझी काहीही चूक नाही”, अशा शब्दात त्यांनी सुखबीर सिंग बादल यांच्यावर घाव केला आहे. “नवज्योतसिंग सिद्धू यांचे आयएसआय आणि पाकिस्तानशी जवळचे संबंध आहे,” असा खळबळजनक आरोप पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांनी केला होता. त्यामुळे, सुखबीर सिंग बादल यांच्या आरोपांना आता नवज्योतसिंग सिद्धू यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

नवज्योतसिंग सिद्धू यांचे पाकिस्तानसोबत जवळचे संबंध आहेत असे सांगणाऱ्या सुखबीर यांनी सिद्धू यांच्या कॉल रेकॉर्ड्सच्या चौकशीची देखील मागणी केली होती. याआधीही केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी नवज्योतसिंग सिद्धू हे पाकिस्तानचे एजंट असल्याचे म्हटले होते. त्याचप्रमाणे राहुल गांधी सिद्धूवर कारवाई करणार का?, असा प्रश्नही हरसिमरत कौर यांनी उपस्थित केला होता.

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धू यांनी लावलेली उपस्थिती आणि पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांशी सिद्धू यांनी घेतलेली भेट यामुळे संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ती माझीच क्लीप | मुख्यमंत्री

News Desk

आताचे अन् विधानसभेनंतरचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस !

News Desk

विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी

Aprna
क्रीडा

India vs Pakistan | भारताचे हे शिलेदार करणार पाकिस्तानचा सामना

News Desk

मुंबई | भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अवघ्या काही वेळात सुरू होईल. आशिया चषक स्पर्धेच्या या लढतीत दोन्ही संघ विजयासाठी आतुर आहेत. या सामन्यातील विजय हा कोणत्याही संघाला पुढील वाटचालीसाठी प्रचंड आत्मविश्वास देणारा ठरणार आहे.

त्यामुळे दोन्ही संघ लढतीत सर्वोत्तम खेळाडूंची फळी घेऊन मैदानावर उतरणार आहेत. पाकिस्तानचा संघ समतोल आहे, पण भारतीय संघाला अद्याप योग्य घडी बसवता आलेली नाही. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध रोहित शर्मा कोणत्या अकरा शिलेदारांना घेऊन मैदानात उतरेल याची उत्सुकता आहे.

हे आहेत अंतिम अकरा खेळाडू

रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, अंबाती रायुडू, केदार जाधव/दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, जस्प्रीत बुमरा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव.

Related posts

सेक्सच्या आवाजाने आवाजाने टेनिसकोर्ट थबकले

News Desk

कोहलीचा नवा विक्रम, सचिनला टाकले मागे

News Desk

अमृता फडणवीस यांच्या राष्ट्रगीताने होणार प्रो- कबड्डी लीगचे उद्घाटन

News Desk