HW News Marathi
राजकारण

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ११ नोव्हेंबरला चक्काजामचा इशारा

सांगली | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी ११ नोव्हेंबरला सर्व ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा आज (बुधवार) सांगलीत दिला आहे. या आंदोलनाच्या काळात महामार्ग बंद ठेवण्यात येणार असून सर्वच गावांमध्ये पूर्ण बंद पाळण्यात येणार असून हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

यंदाच्या ऊस हंगामात अजूनपर्यंत कोणताही उपाय निघालेला नाही. त्यामुळे साखर कारखानदारांनी आता परस्परच हंगाम सुरू करण्याचे ठरविले आहे. कोणताही उपाय न काढता हंगाम सुरू करण्याचा परस्पर प्रयत्न हाणून पाडू, असेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने म्हटले आहे. आता पहिली उचल जाहीर केल्याशिवाय साखर कारखाने सुरु करु देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. त्याचप्रमाणे जर कारखाने सुरु झाले तर एकरकमी ३२१७ रुपये मान्य असे समजू, असा इशारा देखील संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर केले सरकार स्थापन”, मुख्यमंत्र्यांचे विधान

Aprna

येत्या ९० दिवसांत मुंबई शहरातील पायाभूत सुविधांचा विकास करून शहराचा कायापालट करण्याचे नियोजन! – मुख्यमंत्री

Aprna

 राहुल गांधी यांना जम्मू-काश्मीरमध्ये ‘नो एन्ट्री’

News Desk
मुंबई

धारावीच्या पुनर्विकासावरुन बीएमसी-राज्य सरकारमध्ये वाद

swarit

मुंबई । आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीचा लवकरच पुनर्विकास होणार आहे. या प्रकल्पाला राज्य सरकारने ‘विशेष प्रकल्प दर्जा’ देण्याचा निर्णय घेतला आहे. धारावीच्या पुनर्विकासावरुन मुंबई महापालिका आणि राज्य सरकार यांच्यात वाद चांगलाच रंगला आहे. धारावीच्या पूनर्विकास प्रकल्पात महापालिकेचे अधिकार आणि स्थान डावलले जात आहे.असा आरोप शिवसेनेने राज्य सरकारवर केला आहे.

या प्रकल्पातील ७० टक्के जागा ही मुंबई महापालिकेच्या मालकीची आहे. महापालिकेच्या जमिनीवर प्रकल्प राबवताना पालिकेला त्याचा काही मोबदला मिळणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. धारावीमधील २०० एकरहून अधिक जागेतील भूखंडांचे आरक्षण बदलण्याचे निर्णय सीईओनी घेतला आहे. “हा निर्णय मुंबई महापालिकेच्या अधिकारावर गदा आणणारा आहे. तसेच पालिकेला दुबळे करण्याचाच हा प्रयत्न आहे”,असे मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी म्हटले आहे.

Related posts

‘स्वाभिमान’ दुखावताच खोतांनी शेट्टींना दिले पैसे

News Desk

राजा उदार झाला आणि हाती भोपळा आला, ही म्हण केंद्राला तंतोतंत लागू होते – रोहित पवार

News Desk

चार रुपड्यासाठी इमान विकू नका: राज ठाकरेंचे प्रशासनाला खरमरीत पत्र

swarit