HW News Marathi
देश / विदेश राजकारण

शिंदे गटाला नाव-चिन्हा देण्याचा निर्णय योग्य; निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात पाठविले उत्तर

मुंबई | शिंदे गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह देण्याचा निर्णय योग्य असल्याचे निवडणूक आयोनाने (Election Commission of India) सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने शिंदे गटला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले होते. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल केली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाला पाठविलेल्या उत्तरात निवडणूक आयोगाने निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे.

निवडणूक आयोगाने उत्तरात म्हटले, “आम्ही घेतलेला निर्णय योग्य असून उद्धव ठाकरे गटाचे सर्व मुद्दे आम्ही ऐकून घेतले आणि समजून देखील घेतले. ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेचे आम्ही खंडन करत निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय हा अधिकाराच्या कार्यक्षेत्रात म्हणजे अर्धन्यायिक क्षेत्रात राहून घेतला आहे. यापूर्वी निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला पक्षाचे नाव ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मशाल निवडणूक चिन्ह दिले होते.”

या प्रकरणात सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती पीएस नरसिंहा यांच्या पीठाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली होती. यावर निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला उत्तर पाठविले. ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावेळी निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्हाच्या दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागण केली होती.  परंतु, खंडपीठाने ठाकरे गटाची ही मागणी मान्य केली नाही. खंडपीठाने म्हटले, “ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी कोणतीही व्हीप जारी बजावू शकत नाही.”

संबंधित बातम्या

सरन्यायाधीशांचे तत्कालीन राज्यपालांच्या भूमिकेवर सवाल

 

Related posts

विमान नको…केवळ जम्मू-काश्मीरमधील लोकांना भेटण्याचे स्वातंत्र्य द्या !

News Desk

राष्ट्रपतींनी स्वीकारला एम.जे.अकबरांचा राजीनामा

News Desk

लोकसभेत कृषी कायदे रद्द, विरोधकांच्या गोंधळानंतर दुपारी २ वाजेपर्यंत सभागृह स्थगित

News Desk