HW News Marathi
राजकारण

इव्हीएम मशीनचा गैरवापर होतोय, नवाब मलिकांचा आरोप  

मुंबई | लोकसभा पोटनिवडणुक प्रचारात सेना भाजपच्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्यानंतर अखेर सोमवारी मतदानाचा दिवस उगवला परंतु अनेक ठिकाणी इव्हीएम मशीन मध्ये बीघाड झाल्यामुळे मतदान करताना जनतेला समस्यांचा सामना करावा लागला. पालघर,भंडारा-गोंदियामध्ये इव्हीएम मशीनचा गैरवापर करत सरकार निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच इव्हीएम मशीनचा गैरवापर होतोय असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

मतदानासाठी मशीन सुरतहून आणण्यात आल्या आहेत. ज्यावेळी आम्ही यावर प्रश्न उपस्थित केला तेव्हा डिसप्लेच्यावेळी मशीनवर मतदान करताना ते मत भाजपला जात होते. त्यावेळी आम्हाला सांगण्यात आले की तांत्रिक बिघाड आहे. दुरुस्ती केली जाईल. काही मतदान केंद्राबाहेर मतदान करण्यासाठी मतदार ताटकळत होते. काही ठिकाणी दोन-दोन तास मशीन सुरु होत नसल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे ज्याठिकाणी मतदान करण्यास अडथळा आला आहे त्याठिकाणी किमान बॅलेट पेपरने मतदान करण्यास परवानगी द्यावी अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली. देशात ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. लोकशाहीमध्ये मतदार याबाबत शंका घेत असेल तर निवडणूक आयोगाने यावर निर्णय घ्यावा अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपचे नाराज खासदार उदित राज यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

News Desk

सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस घेणार राज्यपालांची भेट

News Desk

मूळ शिवसैनिक म्हणून एकनाथ शिंदेंना भेटणार! – किशोरी पेडणेकर

Aprna