HW News Marathi
राजकारण

मोदी सरकार सर्जिकल स्ट्राईकचे भांडवल करते !

जयपूर | सर्जिकल स्ट्राईकसारख्या संवेदनशील मुद्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकीय भांडवल करीत असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजस्थान येथील प्रचारसभेत केला. राहुल यांनी सर्जिकल स्ट्राईकवरून मोदींवर निशाणा साधला.

म्हणाले की, काँग्रेसच्या काळात व्याप्त काश्मिरात घुसून तीन वेळा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले होते. आमच्या सरकारने याबाबत कधीही वाच्यता देखील केली नाही. मोदी सरकार मात्र लष्कराने २०१६ साली केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न करत आहे. रोजगार आणि विकासाच्या मुद्यावर अपयशी ठरल्यामुळेच मोदी सरकार जवानांच्या शौर्यावरही डल्ला मारीत असल्याची टीका राहुल यांनी केली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये मोदींना पराभव दिसत होता. त्यामुळे मोदींनी सैन्याच्या कारवाईचा राजकीय लाभ घेतला, असेही राहुल यांनी यावेळी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीच्या निर्णयापूर्वी मंत्रिमंडळाला एका खोलीत बंद केले आणि मग हा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे दोन लाख लोकांना उद्ध्वस्त केले, असे राहुल यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मायावतींचा जेडीएसला काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याचा सल्ला

News Desk

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मुंबईत आगमन; असा आहे मुंबई दौरा

Aprna

कंटाळा झटका, कामाला लागा !

Gauri Tilekar