HW News Marathi
राजकारण

गरीबांच्या खिशातला पैसा श्रीमंतांकडे जातो | राहुल गांधी

मुंबई | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. मोदी सरकार देशातील गरीबांची लूट करुन श्रीमंतांचे खिसे भरत आहे. अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीं देशातील सर्व संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. मुंबईत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भारताचे संविधान, संस्थांवर आक्रमण करणाऱ्या भाजपा, आरएसएसविरोधात देशातील सर्व विरोधीपक्ष एकवटले आहेत. लोकांच्या भावना विरोधक राजकीय व्यासपीठावर मांडत असल्याचे राहुल गांधी म्हणाले. एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव कोसळले तरी देशात पेट्रोलचे दर महाग आहेत.

हा पैसा थेट श्रीमंतांच्या खिशात जात आहे. देशातील श्रीमंतांसाठी सरकार काम करत आहे, त्यांची कर्जे माफ केली जात आहेत. पेट्रोल, डिझेलचे दर जीएसटीतंर्गत आणावेत अशी आमची मागणी आहे. मात्र, पंतप्रधान मोदींकडून दुर्लक्ष करत होत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले. दरम्यान, राहुल गांधी आज चंद्रपुरात दादाजी खोब्रागडेंच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी जाणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्राबाबू उगाच स्वतःची दमछाक का करून घेत आहेत ?

News Desk

प्रियांका गांधींच्या राजकारणातील प्रवेशाने भाजप घाबरले !

News Desk

महाआघाडीतील सर्वांनाच पंतप्रधानपदाची स्वप्ने पडत आहेत !

News Desk