HW News Marathi
राजकारण

खरा धक्का तर निकालाच्या दिवशी असतो

मुंबई | खरा धक्का तर निकालाच्या दिवशी असतो असे वक्तव्य विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी रमेश कराड यांनी घेतलेल्या माघारी संदर्भात प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. त्याच बरोबर हि निवडणूक आमच्यासाठी प्रतिष्ठेची आहे आम्ही ती जिंकूच असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने अशोक जगदाळे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

या संदर्भात सोमवारी विधानभवनात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मुंडे म्हणाले, रमेश कराडांना आम्ही पक्षात घेऊन असे काय झाले की त्यांनी माघार घेतली ? या प्रश्नाचे उत्तर फक्त तेच देऊ शकतील. सध्या आमच्या दृष्टीने निवडणूक जिंकणे महत्वाचे आहे. ती आम्ही जिंकूच परंतु या संदर्भात मी तुर्तास काही बोलणार नाही खरा धक्का निकालाच्या दिवशी लागेल असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

हिंगोलीमध्ये भाजप-एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

News Desk

भाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली शंका

News Desk

नाणार प्रकल्पग्रस्तांनी घेतली राज ठाकरेंची भेट

News Desk
महाराष्ट्र

दानवेंच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या मदतीला पवारांचा हात

Adil

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा मतदारसंघ असणाऱ्या भोकरदनमध्ये शेतकरी मेळावा घेत राष्ट्रवादी कॉंग्रेस युवा नेते रोहित पवार यांनी थेट दानवेंच्या बालेकिल्ल्यात स्वारी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत राष्ट्रवादीला मदत करणाऱ्यांचा ऊस आकसापोटी दानवेंच्या कारखान्याकडून घेतला जात नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचा ऊस आता बारामती अॅग्रो घेणार असल्याचे सांगत पवार यांनी यावेळी शेतकऱ्यांना आश्वस्त केले.

भोकरदन तालुक्यातील सिपोरा-बाजार येथे रावसाहेब दानवे यांचा रामेश्‍वर सहकारी साखर कारखाना आहे. या भागातील बहुतांश शेतकऱ्यांचा ऊस याच कारखान्याला जातो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत जाफ्राबाद तालुक्‍यातील काही गावांनी राष्ट्रवादीला मदत केली होती, त्यामुळे येथील शेतकऱ्यांचा ऊस दानवेंच्या कारखान्याकडून घेतला जात नसल्याची तक्रार केली जात आहे. हि बाब राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल मोर्चावेळी स्थानिक कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना सांगितली होती.

 

Related posts

आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात ८ दिवस संचारबंदी!

News Desk

अर्थसंकल्प म्हणजे तिघाडीचा किमान समान फसवणूक कार्यक्रम – आशिष शेलार

News Desk

अभिजित बिचूकलेंना पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूकीत चक्क १०० च्या वर पडली मतं!

News Desk