HW News Marathi
राजकारण

माकडाच्या ‘त्या’ गोष्टीचा अन् काँग्रेस नेत्यांच्या राजीनाम्याचा काही संबंध नाही !

नवी दिल्ली | काँग्रेसमध्ये सध्या निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेकडून काँग्रेसची खिल्ली उडविण्यात आली आहे. “टोपीवाल्याने टोपी खाली टाकल्यावर सगळ्या माकडांनी टोपी खाली टाकून दिली. याचा काँग्रेस नेत्यांच्या राजीनाम्याशी काही संबंध नाही”, असे ट्विट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. लोकसभेत झालेल्या दारुण पराभवानंतर सध्या काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या राजीनामा सत्राच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी ट्विट केले आहे. राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमधील अनेक दिग्गज, बड्या नेत्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.

यंदाच्या लोकसभेत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्षपदाचा प्रस्ताव काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत ठेवला. काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांनी जरी राहुल गांधी यांचा राजीनाम्या स्वीकारण्यास नकार दिला तरी राहुल गांधी मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि अखेर बुधवारी (३ जुलै) आपल्या पदाचा राजीनामा दिला.

मध्य प्रदेश काँग्रेसचे दिग्गज नेते आणि काँग्रेस सरचिटणीस ज्योतिरादित्य सिंधिया, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्यासह अनेकांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. त्यामुळे काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या या राजीनामा सत्राची संजय राऊत यांनी चांगलीच खिल्ली उडविली आहे. यापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील “राहुल गांधी यांनीच राजीनामा देण्यास सुरुवात केली. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर अनेक दिग्गज नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. भाजपचे याच्याशी काहीही देणेघेणे नाही”, असे म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या शेवटाची सुरूवात, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

News Desk

#ArunJaitley : विद्यार्थी नेते ते अर्थमंत्री पदापर्यंतचा थक्क करणारा जीवन प्रवास

News Desk

शिवसेनेने जैन समाजाचा केलेला अपमान विसरू नका !

News Desk