HW News Marathi
राजकारण

पेट्रोल डिझेल दरवाढ प्रश्नावर जनतेच्या भावना दुखाविण्याचा हेतू नव्हता | आठवले

मुंबई | पेट्रोल डिझेल ची दरवाढ रद्द झाली पाहिजे. वाढते इंधन दर रोखले पाहिजेत ही सामान्य जनतेची भावना योग्य असून इंधन दरवाढ कमी करण्याची रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे. इंधन दरवाढ सहित सर्व प्रश्नांवर आपण नेहमी जनतेच्या भावना समजून घेतल्या आहेत त्यामुळे इंधन दरवाढ बद्दल बोलताना आपला कुणाच्याही भावना दुखाविण्याचा हेतू नव्हता. आपण नेहमी जनभावनेप्रति संवेदनशील आहोत त्यामुळे माझ्या वक्तव्यातून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असा खुलासा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईत केला.

काल जयपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत इंधन दरवाढ बद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर केलेल्या विधानावरून केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज अधिकृत खुलासा करून दिलगिरी व्यक्त करून इंधन दरवाढ बाबत आपली भूमिका स्पष्ट केली. इंधन दरवाढीचा रामदास आठवलेंच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाने विरोध केला आहे. इंधन दरवाढी मुळे सामान्य जनतेला महागाई चा सामना करावा लागतो. सामान्य जनतेच्या व्यथा आपल्याला चांगली माहीत असून जनभावनेच आपण नेहमीच आदर राखला आहे. आपण सामान्य जनतेतूनच आडीअडचणींचा सामना करूनच पुढे आलो आहोत त्यामुळे सामान्य जनतेचे नेमके प्रश्न आपल्याला चांगले माहीत आहेत आणि आपण त्या खस्ता खाल्ल्या आहेत. त्या व्यथा अनुभवल्या आहेत.

त्यामुळे जनतेच्या भावनांबद्दल आपण कधीही असंवेदनशील राहू शकत नाही. जनतेच्या भावना दुखाविणारे मत आपण कधीही मांडले नाही. इंधन दरवाढबाबत विचारण्यात आलेला प्रश्न हा माझ्या व्यक्तिगत स्तरावर विचारला होता मात्र इंधन दरवाढीबाबत जनतेला होत असलेल्या त्रासाबद्दल जेथे जेथे थेट विचारले जाते तेथे माझे उत्तर हे इंधन दरवाढ रद्द करावे असेच असते तसेच सामान्य जनतेची जी मागणी असते तीच मागणी माझा रिपब्लिकन पक्ष करीत आला असून आपण ही सदैव सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढत आलेलो आहोत असे स्पष्टीकरण रामदास आठवले यांनी आज केले.

इंधन दरवाढ हा गंभीर विषय आहे. याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना इंधन दरवाढ कमी करण्याबाबत सूचना केल्या आहेत. रिपब्लिकन पक्षाने हे इंधन दरवाढ रद्द करण्याची मागणी केली आहे. इंधन दरवाढ प्रश्नांवर मी केलेले वक्तव्य कुणाच्या भावना दुखविणारे ठरले असल्यास त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करीत असल्याचे रामदास आठवले यांनी अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शिवसेना २०१९ ची निवडणूक ‘स्वबळावर लढणार’

News Desk

राहत्या वॉर्डात निवडून यायचे वांदे !

swarit

ममता या पश्चिम बंगालची संस्कृती, लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत !

News Desk
देश / विदेश

२०१९च्या निवडणुकीसाठी भाजपचा नवा फॉर्म्युला

News Desk

नवी दिल्ली | भाजपने २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षांची मोर्चेबांधणी करायाला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी भाजपचा पराभव करण्यासाठी महाआघाडी उभारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तर भाजपने २०१४ प्रमाणे निवडणुकीत मोठे यश मिळविण्यासाठी रणनीती आखली आहे.

टी-२० आणि एक बूथ दहा यूथ नेमके काय आहे?

भाजपच्या ठरविलेल्या टी-२०च्या रणनितीनुसार पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता २० घरांमध्ये जाऊन चहा पिण्याबरोबरच मोदी सरकारच्या कामांची माहिती कुटुंबाला सांगणार आहे. टी-२० नुसार भाजप देशातील प्रत्येक सामान्य व्यक्तीच्या घराघरात पोहचेल. त्यामुळे आगामी निवडणुकीत याचा मोठा फायदा होईल, असा विश्वास भाजपला वाटत आहे.

भाजप “टी-२०” आणि “एक बूथ दहा यूथ” असे प्रचार कार्यक्रम लवकरच सुरू करणार आहे. या माध्यमातून भाजप त्यांच्या खासदार, आमदार, स्थानिक आणि बूथवरील कार्यकर्त्यांतर्फे त्यांच्या क्षेत्रात सरकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यात येणार आहेत.

Related posts

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटर अकाऊंटवर ब्लॉक केल्याप्रकरणी सात जणांनी न्यायालयात तक्रार

News Desk

Republic Day | प्रजासत्ताक दिनाची ही छायाचित्रे नक्की पहा

News Desk

जम्मू-कश्मीरमच्या कुलगाममध्ये ५ दहशतवाद्यांचा खात्मा

News Desk