HW News Marathi
राजकारण

माझा भीमा-कोरेगाव, एल्गार परिषदेशी काहीही संबंध नव्हता | तेलतुंबडे

मुंबई | नक्षली संबंधांच्या आरोपाखाली अटक होऊन तात्काळ सुटका झाल्यानंतर ज्येष्ठ विचारवंत आनंद तेलतुंबडे यांनी आज (४ फेब्रुवारी) मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकारांशी बातचीत केली. “सर्वोच्च न्यायालयाने ११ फेब्रुवारीपर्यंत अटकेला स्थगिती दिलेली असतानाही सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धुडकावून लावत आपल्याला सेशन कोर्टाच्या आदेशाप्रमाणे अटक करण्यात आल्याचे आनंद तेलतुंबडे यांनी यावेळी सांगितले. पोलीसांनी रचलेले प्रकरण केवळ माझ्याविरूद्ध नसून हा प्रकार भारतीय नागरिकांच्या विरोधात आहे. मला युएपीए सारख्या कायद्याखाली कोणतीही सुरक्षा न देता अटक करण्यात आले. एक्स एक्स हे सरकारचे असे स्ट्रक्चर आहे कि ज्यामध्ये कोणाचेही नाव टाका आणि अटक करा”, असा आरोपही आनंद तेलतुंबडे यांनी केला आहे.

“अटकेच्या दिवशी मी कोचीवरून सकाळी ०१:४५ येत असताना पोलिसांनी मला मुंबई येथे अटक करून पुण्याला नेले. त्यात मला जी वागणूक मिळाली ती मला अपेक्षित नव्हती. मला या देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. भीमा-कोरेगाव येथील कार्यक्रम हा बी. जी. सावंत व कोळसे पाटील हे आयोजक असून माझे नाव फक्त आयोजन समितीत होते. मात्र, माझा भीमा-कोरेगाव किंवा एल्गार परिषदेशी माझा काहीही संबंध नव्हता”, असे तेलतुंबडे म्हणाले. “सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही कशा प्रकारे आपल्याला अटक करण्यात आली याबाबत आनंद तेलतुंबडे यांनी खुलासा केला आहे.

“भीमा-कोरेगाव प्रकरणावर मी टिकात्मक लेख लिहिला होता. ज्यामुळे दलित माझ्यावर नाराज होते”, अशी माहिती मला मिळाली. टिकात्मक लेख लिहूनही मला त्यात गोवण्यात आले. मला अटक करण्यात आलेल्याच्या निषेर्धात अमेरिका व जगातील बऱ्याच देशांनी, आयआयटी, एमआयटी यांच्या विद्यार्थ्यांनी निषेध नोंदविला. फ्रेंच दूतावासाने देखील या प्रकरणी निषेध नोंदवला होता. माझ्या बाबतीत षडयंत्र रचण्यात येत आहे. लोकशाही विचार आणि सरकारी धोरणांबद्दल बोलणाऱ्याला माओवादी ठरवण्यात येते. माझ्यासारख्या शिकलेल्या विचारवंताची भारतासारख्या लोकशाही देशामध्ये ही अवस्था आहे मग सर्वसामान्य माणसाची काय अवस्था होईल”, असा प्रश्नही तेलतुंबडे यांनी केला आहे.

पोलिसांच्या अटकेच्या कारवाईनंतर आनंद तेलतुंबडे यांनी स्वतःबद्दल बोलताना म्हटले कि, “भारत पेट्रोलियममध्ये काम करत असताना माझा डेमोक्रेटींग पक्षाशी संबंध आला. मला कोणी सांगितल्याशिवाय मी कधी लिखाण केले नाही. भारतातला पहिला कोर्स बी डेट अँन्यालिसेस केला असून त्यात मी पहिला होतो. अशा माणसाला पोलिसांनी अटक केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

त्या भाजप उमेदवाराचे नाव ‘कुजय’ असायला हवे होते, धनंजय मुंडेंची बोचरी टीका

News Desk

एअर स्ट्राईकमध्ये २५० पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा, शहाचा दावा

News Desk

राफेलवर झालेल्या स्वार्थी राजकारणामुळे देशाचे मोठे नुकसान, पंतप्रधान मोदींची टीका

News Desk