HW News Marathi
राजकारण

…तर काँग्रेसमध्ये एकही माणूस शिल्लक राहणार नाही !

मुंबई | “भाजपने जर आता आपला दरवाजा खुला केला तर काँग्रेस कार्यालयात एकही माणूस शिल्लक राहणार नाही”, अशा सूचक शब्दात राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. लोकसभा निवडणुकांचा निकाल अगदी उद्यावर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार यांनी केलेले हे विधान सूचक ठरते. “काँग्रेस नेत्यांची नार्को टेस्ट केली तर त्यांची पक्षात राहण्याची इच्छा नाही हे सिद्ध होईल”, असेही मुनगंटीवार यावेळी म्हणाले. त्याचप्रमाणे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करू, असा दावा देखील त्यांनी केला आहे.

“आमच्यावर टीका करणाऱ्यांनी देखील एसीमध्ये बसूनच टीका केली आहे. त्यांनी टीका करताना देखील काहीतरी तारतम्य बाळगायला हवं. त्यांच्या बोलण्यातून विरोधी पक्षाची मानसिकता लक्षात येते. काँग्रेस नेत्यांची नार्को टेस्ट केली तर त्यांची पक्षात राहण्याची इच्छा नाही हे सिद्ध होईल. भाजपने जर आपला दरवाजा खुला केला तर काँग्रेस कार्यालयात एकही माणूस शिल्लक राहणार नाही”, असे मुनगंटीवार म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य प्रदेशात संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ७४ टक्के मतदान

News Desk

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या महाराष्ट्रात १ हजार जाहीर सभा

News Desk

प्लास्टिकबंदीचा निर्णय नोटाबंदीसारखा नाही | रामदास कदम

swarit