HW News Marathi
राजकारण

यंदाच्या दिवाळीत एक दिवा श्रीरामाच्या नावाने पेटवा !

नवी दिल्ली | ‘यंदाच्या दिवाळीत एक दिवा श्रीरामाच्या नावाने पेटवा, लवकरच काम सुरू होणार आहे. दिवाळी झाल्यानंतर राम मंदिराच्या उभारणीचे पाहू’ असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. अयोद्धा राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच पेटला असताना योगी आदित्यनाथ यांचे हे वक्तव्य केले आहे. योगी आदित्यनाथ राजस्थान मधील एका कार्यक्रमात बोलत होते.

“राम मंदिराचे प्रकरण न्यायालयात आहे, पण लवकरात लवकर यावर निर्णय यावा अशी आमची इच्छा आहे’, असे केंद्रीय मंत्री पीपी चौधरी यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे जर न्यायालयाच्या निकालासाठी वेळ लागणार असेल तर राम मंदिर उभारण्यासाठी केंद्र सरकारने अध्यादेश काढावा, अशी वैयक्तिक मागणी असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, अयोध्या राम मंदिराचा मुद्दा अद्याप न्यायप्रविष्ट असताना सर्वच राजकीय पक्ष आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केवळ मतांचे राजकारण करीत असताना दिसत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कदाचित मुख्यमंत्री माझ्या भाषणाला घाबरले असतील !

News Desk

मराठा आरक्षणावरून तानाजी सावंतांचे वादग्रस्त वक्तव्य; मराठा क्रांती मोर्चाकडून संताप

Aprna

राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याची कृती म्हणजे लोकशाहीचा खून! – नाना पटोले

Aprna
क्राइम

मिलिंद एकबोटेविरधात अटक वॉरंट जारी

swarit

पुणे – भिमा-कोरेगाव दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात पुणे सत्र न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून मिलिंद गायब झाले आहेत. त्यांनी मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामिनाची याचिका दाखल केली होती. पण, कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर त्यांनी पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. पण, येथे ही त्यांची याचिका फेटाळून लावल्यामुळे एकबोटेंना अटक अटळ आहे. यासाठी पोलिसांनी एक पथक तयार केले असून एकबोटे यांचा कसून शोध घेतला जात आहे.

भिमा-कोरेगाव येथील विजयस्तंभाला वदंना करण्यासाठी जमलेल्या नागरिकांवर जमावाने हल्ला केला होता. त्यात एक व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण झाला होता. या प्रकरणात मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिंड गुरुजी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

Related posts

भोकर पोलीस ठाणे झाले आता ” स्मार्ट “

News Desk

भावजयीच्या प्रेमात दीर झाला बेभान, पत्नी आणि मुलांचा गळा चिरला

News Desk

मंजुळावर तुरूंगात पाशवी लैंगिक अत्याचार – इंद्राणीची माहिती

News Desk