HW News Marathi
राजकारण

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI अहवालानंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई | “दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणात ज्यांनी आरोप केले त्यांच्यासाठी हा अहवाल आहे”, असा टोला माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना लगावला आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपुतची मॅनेजर दिशा सालियन मृत्यूप्रकरणात नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंवर गंभीर केले आहेत. आदित्य ठाकरेंनी आज (23 नोव्हेंबर) बिहार दौऱ्यावर जाण्यापूर्वी पत्रकरांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी प्रतिक्रिया दिली.

आदित्य ठाकरे म्हणाले, “बरोबर आहे, पण, त्यांच्या घाणेरड्या राजकारणात जाऊ इच्छित नाही. चिखलात मला पडायचेच नाहीये. जे यावर बोलत होते. त्यांच्यासाठी हा आवहवाल आहे,” अशी पहिली प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. सीबीआयच्या अहवालानुसार, “दिशाचा ही दारूच्या नशेत असताना तोल गेल्याने 14 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.”

दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणात राणेंनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. राणे आरोप करताना म्हणाले, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिशा सालियानचा खून झाला असून तिच्यावर अत्याचार केल्यानंतर तिचा खून झाला. या प्रकरणातील आरोपींना  अटक का झालेली नाही?, कोण मंत्री होते?, का वाचवण्यात आले?, सचिन वाझेंसारख्या पोलीस अधिकाऱ्याला खात्यात आणून या प्रकरणात मंत्र्याला वाचवले. दिशा सालियान, अभिनेता सुशांत सिंह राजपूतसंदर्भात केलेले पाप लोक विसरता येणार नाही. आता तुमची सत्ता नाही”, असे अनेक सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरेंवर आरोप केले होते.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात ७ जागांसाठी आज मतदान, दिग्गजांचे भवितव्य होणार सीलबंद

News Desk

हा नवा भारत कोणत्याही प्रकारचा दहशतवाद सहन करणार नाही !

News Desk

विरोधकांना पराभूत करण्यासाठी तेलंगणात घुबडांचा वापर

News Desk