HW News Marathi
राजकारण

#RamMandir : उद्धव ठाकरेंचा हा दौरा म्हणजे इव्हेंट !

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्यावर एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी बोचरी टीका केली आहे. उद्धव ठाकरेंचा हा दौरा म्हणजे इव्हेंट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता, भाजप-शिवसेना युतीसाठी ही नौटंकी सुरू असल्याची टीका इम्तियाज जलील यांनी केली.

शिवसेना-भाजपने सत्तेत असून गेली चार वर्षे एकमेकांवर टीका करत होते. परंतु निवडणुका तोंडावर आल्याने एकत्र कसे यायचे त्यासाठी हा अयोध्या इव्हेंट होत असून अयोध्या दौऱ्यात सभा होणार नव्हती, तर मग महाराष्ट्रातून एवढे शिवसैनिक का घेऊन गेले? असा सवाल देखील जलील यांनी उद्धव ठाकरेंसह शिवसेनेच्या इतर नेत्यांना विचारला आहे. अयोध्या प्रकरणाची सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल, तो आम्हाला मान्य असेल, असेही इम्तियाज जलील म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तेव्हा कळेल, वारसाला मिळते की कर्तृत्वाला”, शुभांगी पाटील यांचा सत्यजीत तांबेंना टोला

Aprna

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे गणेश पूजन

News Desk

आम्हाला त्यावेळी काँग्रेसने प्रतिसाद दिला नाही, आता आम्ही मागे हटणार नाही !

News Desk