HW News Marathi
राजकारण

आमच्या तिघांचा त्रिशूळ सर्व प्रश्न मार्गी लावेल !

इंदापूर | “हर्षवर्धन पाटील, गिरीश महाजन आणि मी त्रिशूळासारखे आहोत”, असे सूचक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. “ज्याप्रमाणे भोले शंकराचा त्रिशूल चालला की काम झाल्याशिवाय राहत नाही. त्याप्रमाणेच आमच्या तिघांचा त्रिशूळ इंदापूर तालुक्यातील सर्व प्रश्न मार्गी लागल्याशिवाय सोडणार नाही”, असे विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी हर्षवर्धन पाटील यांचे कौतुक करताना राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. “मी २० वर्षांपासून हर्षवर्धन पाटलांना ओळखतो. कधीही त्यांनी आपला आहे कि दुसरा आहे याचा विचार केला नाही. जो त्यांच्याकडे गेला त्याला मदत करायचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणूनच म्हणतो कि हर्षवर्धन पाटील हा खऱ्या अर्थाने जनतेचा नेता आहे”, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी हर्षवर्धन पाटील यांचे कौतुक केले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस इंदापूर येथील प्रचारसभेनंतर बारामतीमध्ये भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारासाठी गेले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीसह शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “आता इथून मी बारामतीलाच जात आहे. मला माहित आहे कि बारामतीचे काही नेते इथे येऊन त्रास द्यायचा प्रयत्न करतील. पण, चिंता करू नका. बारामतीच्या नेत्यांचा बंदोबस्त मी करणार आहे”, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवराज सिंग यांचा राजीनामा, काँग्रेसला सत्तेसाठी मायावतीसह अखिलेशची सात

News Desk

सलग तीन दिवस राज्यातील सत्तांतरावर युक्तीवाद पूर्ण; सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला निकाल

Aprna

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ED कडून समन्स

Aprna