HW News Marathi
राजकारण

कोलकात्यामध्ये टीएमसी-भाजप संघर्षाने घेतले हिंसक वळण

कोलकाता | सध्या पश्चिम बंगालमध्ये भाजप विरुद्ध टीएमसी अशी अत्यंत आक्रमक लढत सुरु आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देखील वारंवार पंतप्रधान मोदींविरुद्ध अत्यंत आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. मात्र, या संघर्षाने आता हिंसक वळण घेतले आहे. कोलकाता येथील भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा रॅलीदरम्यान आज (१४ मे) भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली. या रॅलीदरम्यान चक्क अमित शहा यांच्या ट्रकवर काठ्या भिरकावण्यात आल्या. त्याचप्रमाणे भाजप आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे येथील वातावरण प्रचंड तणावपूर्ण झाले होते.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सुरज परमार यांच्या डायरीवर एसआयटी स्थापन करा”, संजय राऊतांची सरकारकडे मागणी

Aprna

#Results2018 : भाजपने जनतेचा राग समजून आत्मपरिक्षण करावे !

News Desk

…मग काँग्रेसला महाआघाडी करण्याची गरज का पडते ?

News Desk