HW News Marathi
राजकारण

राज्यातील भीषण पाणीटंचाईवर उपाय म्हणून कृत्रिम पाऊस पाडणार

मुंबई | महाराष्ट्र मोठ्या दुष्काळ समस्येला तोंड देत आहे. दरम्यान, या समस्येवर मात करण्यासाठी आता राज्य शासनाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील भीषण पाणी टंचाईचा विचार करत पाण्याच्या उपलब्धतेसाठी आवश्यक त्या सर्व तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. यासाठी एरियल क्लाऊड सीड‍िंगद्वारे (Arial Cloud Seeding) कृत्रिमरित्या पाऊस पाडण्याचा निर्णय मंगळवारी (२८ मे) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

एरियल क्लाऊड सीड‍िंगद्वारे योग्य ढगांची उपलब्धता बघून कृत्रिम पाऊस पाडण्यात येतो. दरम्यान, या योजनेसाठी आधीपासूनच पूर्वनियोजन करणे आवश्यक असते. म्हणूनच आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात एरियल क्लाऊड सीड‍िंगद्वारे कृत्रिम पाऊस पाडण्यास मान्यता देण्यात आली आहे. या उपाययोजने ३० कोटी रुपयांचा खर्च येणार असून ही रक्कम देखील मंजुर करण्यात आली आहे. राज्यात असलेली भीषण पाणी टंचाई लक्षात घेता यंदा चांगला पाऊस होणे अत्यंत आवश्यक आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अडवाणी हे आमचे प्रेरणास्रोत, पक्षातील प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल आदर !

News Desk

भाजपचा विजय, लोकशाहीचा पराभव | राहुल गांधी

News Desk

आजोबांचा अपमान झाला म्हणून सुजयने पक्ष सोडला !

News Desk