HW News Marathi
राजकारण

टपरीवरची कॉफि एकदम बेस्ट… अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचा आज सातवा दिवस आहे. काल माहूर येथील सभा झाल्यानंतर आज हिंगोली येथील सभेला हल्लाबोल यात्रा मार्गक्रमण करत होती. प्रवास करत असताना अजितदादांना कॉफिची तल्लफ लागली आणि त्यांनी गाडी थांबवायला सांगितली… रस्त्यावर कुठेच चांगले हॉटेल नव्हते म्हणून चालक गाडी थांबवण्यासाठी थोडे शाशंक होते. मात्र अजितदादांनी कळमनुरी तालुक्यातील माळेगाव फाटा येथे एका टपरीवर गाडी थांबवून तिथेच कॉफि पिणे पसंद केले.

नेतेमंडळी गाडीने जाताना काचही खाली करत नाहीत. सामान्य माणूस जिथे वावरतो अशा ठिकाणी कार्यक्रमाव्यतिरीक्त शक्यतो जात नाहीत, असा गैरसमज लोकांना असतो. मात्र अजितदादांनी हा समज मोडीत काढत टपरीवर लोकांमध्ये बसून कॉफि प्यायल्यामुळे सर्वांच आश्चर्यचकित झाले.

कॉफि बनवेपर्यंत अजितदादांनी चहावाल्याशी संवाद साधायला सुरुवात केली. टपरीवर आणखी काय स्पेशल मिळते असे विचारल्यावर इथे भजी आणि खिचडी फेमस असल्याचे चहावाल्याने सांगितले. तेव्हा गरम गरम भज्यांचाही दादांनी यावेळी आस्वाद घेतला. अजितदादांना माणूस जीवाभावाचा… असं म्हणतात याचा प्रत्यय यावेळी उपस्थितांना आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज ठाकरे साधणार उत्तर भारतीयांशी संवाद

News Desk

शिवसेना ही गांडुळाची अवलाद…त्याचं तोंड इकडे की तिकडे कळत नाही | अजित पवार

News Desk

राजू शेट्टींना सरकारकडून चर्चेचे निमंत्रण; चक्काजाम आंदोलन तात्पुरते स्थगित

Chetan Kirdat
देश / विदेश

मुंबई विद्यापीठाला टॉप १०० मध्ये जागा नाही

News Desk

नवी दिल्ली | केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एनआरडीने नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) यांनी यादी जाहीर केली आहे. या यादीत देशातील टॉप विद्यापीठ, कॉलेज, इन्स्टिट्युट इत्यादी यादी जाहीर करण्यात आली. तिसऱ्यांदा जाहीर करण्यात आलेल्या यादीत पहिल्या १०० विद्यापीठांमध्ये यंदा देखील मुंबई विद्यापीठाला स्थान मिळवता आली नाही.

विद्येचे माहेर घर असलेल्या पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला टॉप १० विद्यापीठाच्या यादी नववे स्थान मिळाले आहे. विद्यापीठाच्या यादीत बंगळुरुचे इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स पहिल्या क्रमांकावर तर दुसऱ्या क्रमांकावर दिल्लीचे जवाहरलाल नेहरु विद्यापीठ आणि तिसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेशातील बनारस हिंदू विद्यापीठ आहे.

तसेच देशातील टॉप १० अभियांत्रिकी महाविद्यालयातील पवई येथील आयआयटी मुंबईला तिसरा क्रमांक मिळाला आहे. तर माटुंगा येथील रसायन तंत्रज्ञान संस्था (आयसीटी)ने ३०व्या क्रमाकांव झेप घेतली आहे. महाविद्यालयाच्या यादीत पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्याल स्थान मिळवण्यात यश आले आहे.

Related posts

सीबीएसई बोर्डाचा १२ वीचा निकाल जाहीर, ८८.७८ % विद्यार्थी उत्तीर्ण

News Desk

बलुचिस्तानमधील क्वेट्टा शहरात पुन्हा बॉम्बस्फोट

News Desk

भारतीय उच्चायुक्तांना गुरुद्वारामध्ये प्रवेश नाकारला

News Desk