HW News Marathi
राजकारण

शहाडचे पंपिंग स्टेशन महापालिकेला हस्तांतरित करा | आमदार किणीकर

नागपूर | विधीमंडळाच्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशना दरम्यान आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी उल्हासनगर शहरास पाणीपुरवठा करणार्‍या शहाड येथील एम.आय.डी.से.चे पंपिंग स्टेशन उल्हासनगर महानगरपालिकेस हस्तांतरित करण्याची मागणी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदना द्वारे केली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची नागपूर येथे विधानभवनातील दालनात भेट घेतली. खा. डॉ. श्रीकांत शिंदे हे ही याप्रसंगी उपस्थित होते.

उल्हासनगर शहरासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. उल्हासनगर शहराची लोकसंख्या सुमारे ६ लाखांपेक्षा जास्त असून सन १९९४ पासून उल्हासनगर महापालिकेने जवळपास ३०० कोटी रुपये पाण्याच्या बिलापोटी एम.आय.डी.सी. ला अदा केले आहे, असे असताना एम.आय.डी.सी. कडून वारंवार पाणी कपात करणे किंवा विद्युत भारनियमनामुळे पाणी पुरवठा खंडित केला जात असल्याने नागरिकांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ही योजना महापालिकेकडे हस्तांतरित करावी यासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे आणि आ. डॉ. बालाजी किणीकर पाठपुरावा करत आहेत. गुरुवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी पुन्हा ही मागणी केली.

यावेळी उल्हासनगर शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपशहरप्रमुख राजेंद्र शाहू, आदिनाथ कोरडे, विभाग प्रमुख राजेश माने, शिवाजी जावळे, सुरेश सोनवणे, अंकुश म्हस्के, अनिल मराठे,स्वप्नील बागूल, के. डी. तिवारी, जयकुमार केणी, कळवंत सोहाता, सागर उतवाल, अशोक दिवटे, किरण जवरास आदि उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#RamMandir : निवडणुकीच्या काळातच राम राम करतात, नंतर आराम करतात !

News Desk

‘एल्गार’चा तपास एनआयएकडे देण्याचा केंद्राचा निर्णय काळजी वाढवणारा !

News Desk

#LokSabhaElections2019 : पंतप्रधान मोदींनी जाहिरातींवर तब्बल ३०४४ कोटींचा खर्च केला !

News Desk
राजकारण

मुख्यमंत्र्यांनी नाणार प्रकल्प रद्द करावा | नीलम गो-हे

News Desk

नागपूर | मुख्यमंत्र्यांनी सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनातच नाणार स्थानिकांचा विरोध आणि पर्यावरण जोपासण्यासाठी नाणार प्रकल्प रद्द करावा अशी मागणी शिवसेना प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषद सभागृहात केली. नाणार प्रकल्पाबाबत आज विधानपरिषदेत औचित्येच्या मुद्याद्वारे शिवसेना प्रवक्त्या यांनी चर्चा घेण्यात यावी अशी विनंती केली.

यावेळी बोलताना डॉ. नीलम गो-हे म्हणाल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषद सदस्यांनी विचारलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना १० जुलै सांगितले होते की स्थानिक नागरिकांचा विरोध असेल तर नाणार प्रकल्प लादला जाणार नाही. नाणार प्रकल्प भारताच्या पश्चिम किनाऱ्यापट्टीवर निर्मितीसाठी करार झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ग्रामपंचायतींचे ठराव हे लोकसभा व विधीमंडळातील ठराव इतकेच महत्वाचे आहेत. ज्या प्रकल्पाबाबत स्थानिक ग्रामपंचायतींनी विरोधात ठराव केले आहेत ते प्रकल्प सरकारने जनतेवर लादू नये. याच प्रमाणे नाणार रिफायनरी व बुलेट ट्रेन याबाबत स्थानिक ग्रामपंचायतींनी प्रकल्प रद्द करण्यासाठी ठराव केले आहेत. प्रकल्पवासीयांचा विरोध आणि पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनातच चर्चा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्प रद्द करावा अशी मागणी केली.

Related posts

जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे !

Gauri Tilekar

मराठा समाजाच्या आरक्षणाचा अहवाल आज शासनाकडे होणार सादर

News Desk

‘अंधेरी पूर्व’ विधानसभा मतदारसंघ १ नोव्हेंबर रोजी जाहीर प्रचारावर निर्बंध लागू

Aprna