HW News Marathi
राजकारण

काँग्रेसने दिग्गज नेत्यांमधील वाद सोडविण्यासाठी नेमली त्रिसदस्यीय समिती

भोपाळ | यंदाच्या निवडुकीत मध्य प्रदेशात सत्ता मिळविण्यासाठी काँग्रेस पक्षाचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. काल (बुधवारी) राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या निवडीसाठी काँग्रेस पक्षाची बैठक झाली होती. या केंद्रीय निवड बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या समोरच काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांमध्ये मोठा वाद झाला आहे. ‘आपल्या गटातील उमेदवारांना तिकीट मिळावे’ यासाठी दिग्विजय सिंह आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात हा मोठा वाद झाला आहे.

दरम्यान या केंद्रीय निवड बैठकीत झालेला वाद इतका मोठा होता कि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना एक त्रिसदस्यीय समिती नेमावी लागली आहे. अशोक गहलोत, वीरप्पा मोईली आणि अहमद पटेल यांचा या समितीत समावेश असून त्यांनी काल रात्री याबाबत बैठक देखील घेतली. परंतु, तरीही या वादावर कोणताही उपाय निघालेला नाही. दरम्यान येत्या ५ नोव्हेंबरपर्यंत काँग्रेस आणि भाजप हे दोन्हीही पक्ष आपल्या सर्व उमेदवारांची नावे जाहीर करणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भाजप-काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू !

Gauri Tilekar

 मोदी विष्णूचा तेरावा अवतार तर शहा चाणक्य !

News Desk

ममतांचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या महिलेची सर्वोच्च न्यायालयाने केली सुटका

News Desk
राजकारण

नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली इंधन दरवाढी विरोधात आंदोलन

swarit

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्याविरोधात पक्षाचे राज्यउपाध्यक्ष आणि राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली उद्या बुधवार ३० मे रोजी मुंबईच्या अणुशक्तीनगरमध्ये भव्य आंदोलन करण्यात येणार आहे.

पेट्रोल डिझेलच्या दरात गेल्या पंधरा दिवसांपासून दिवसेंदिवस वाढ होताना पहायला मिळत आहे. त्यामुळे सर्व जनता त्रस्त झाली आहे. अनेकांना दरवाढ का होत आहे याचे समर्पक कारण सरकारकडून अपेक्षित आहे. परंतु कर्नाटक निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर सरकार दिवसेंदिवस पेट्रोल डिझेल दरवाढ करत असल्याचा तर्क सर्वसामान्य जनता लावताना पहायला मिळत आहे. या दरवाढी विरोधात महाराष्ट्रभरात वेगवेगळ्या पद्धतीने राजकीय पक्ष आंदोलन करत आहेत.

नंदुरबार सारख्या ठिकाणी महाराष्ट्रातले लोक गुजरातला जाऊन पेट्रोल भरत आहेत. राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने पेट्रोल-डिझेलच्याविरोधात तीव्र आंदोलन छेडले गेले आहे. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून मुंबईत ३० मे रोजी सकाळी १० वाजता पांजरापोळ सर्कल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयापासून या आंदोलनाची सुरुवात होणार आहे.

 

Related posts

संविधान बदलण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही ते होऊ देणार नाही !

News Desk

मायावती विरोधी पक्षांच्या बैठकीत सहभागी होणार नाहीत, बसपचा खुलासा

News Desk

आता साधू संतांना मिळणार पेन्शन

News Desk