HW News Marathi
राजकारण

लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा भारतरत्न किताबाने गौरव होण्यासाठी प्रयत्न करणार

मुंबई | जागतिक कीर्तीचे साहित्यसम्राट क्रांतिकारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात अतुलनीय अद्वितीय योगदान असल्याने त्यांच्या कर्तृत्वाचा भारतरत्न किताबाने मरणोत्तर गौरव व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगत देशभरातील जनतेला लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या शुभेच्छा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिल्या आहेत.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य माणसातील माणूस जागा करणारे माणसा माणसातील भेद दूर सारून माणूस जोडणारे माणसाला क्रांती चा धागा करणारे क्रांतिकारी साहित्य आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंना भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई चे अप्रतिम वर्णन करणारी लावणी लिहिली आहे.संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचे भरीव योगदान राहिले आहे. श्रमिक कष्टकरी वर्गासाठी त्यांनी साहित्यातून संघर्ष आणि जागृती निर्माण केली. त्यांच्या साहित्यामुळे शोषित वंचित श्रमिक आणि दलितांबद्दच्या प्रश्नांबद्दल जागतिक स्तरावर सहानुभूती मिळवून दिली. असे सांगत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मुंबईत तसेच त्यांच्या वाटेगावी जागतिक दर्जाचे स्मारक उभारावे यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे रामदास आठवले म्हणाले.

जग बदल घालुनी घाव सांगून गेले आम्हा भीमराव ही काव्यपंक्ती लिहून अण्णाभाऊ साठे यांनी मातंग समाजसह सर्व वंचित समाज घटकाला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा विचार आणि त्यासाठी सनदशीर मार्गाने संघर्ष करण्याचा विचार मांडला आहे.मातंग आणि बौद्ध समाजसह सर्व वंचित समाजघटकांची निळ्या झेंड्याखाली एकजूट होणे हीच खरी लोकशाहिर अण्णाभाऊ साठेंना त्यांच्या जयंतीनिमित्त खरी आदरांजली ठरेल असे सांगत रामदास आठवलेंनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना विनम्र अभिवादन केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

OBC आरक्षणासह निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा! दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करा – सर्वोच्च न्यायालय

Aprna

INX Media Case: पी. चिदंबरम यांच्या सीबीआय कोठडीत आणखी चार दिवसांनी वाढ

News Desk

भाजपची शिवसेनेला ‘उपसभापती’ ची ऑफर

News Desk
मुंबई

मुंबईतील जेल भरो आंदोलनाला अल्प प्रतिसाद

swarit

अपर्णा गोतपागर | गेल्या काही दिवसांपासून संपुर्ण राज्यभरात आरक्षणाच्या मुद्यांवरुन मराठे आक्रमक झाले आहेत. औरंगाबाद मधील आरक्षणासाठी सुरू असलेले आत्महत्या सत्र थांबता थांबेना. चाकणमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीला हिंसक वळण लागले होते. हे आंदोलन इतके हिंसक होते. की, चाकणमध्ये जमाव बंदी लागू करावी लागली.

मराठा आंदोलकांपैकी काहींनी आत्महत्या केल्यामुळे बुधवारी मराठा क्रांती मोर्चाकडून जेल भरो आंदोलनाची हाक देण्यात आली होती. महाराष्ट्रात काही ठिकाणी या आंदोलनाला विषेश प्रतिसाद मिळाला तर काही ठिकाणी अल्प प्रतिसाद मिळाला. ज्या आझाद मैदानात लाखोंच्या संख्येने मराठे मुक मोर्चाला जमले होते तिथे केवळ २५ मराठा आंदोलक जेल भरो आंदोलना दरम्यान पहायला मिळाले.

कडेकोट पोलीस बंदोबस्त

मुंबईतील आझाद मैदानात आज जेल भरो होणार आहे. या पार्श्वभुमीवर मैदानात कडकोट बंदोबस्त करण्यात आला. यासाठी पोलिसांची मोठी तुकडी आणि रैपिट कंट्रोस फोर्स(RCP) आंदोलकांना रोखण्यासाठी बोलविण्यात आली होती.तसेच आंदोलकांना पागविण्यासाठी पाण्यांच्या टॅकर दाखल झाले होते.जेल भरो सकाळी ११ वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार होती. परंतु १२ वाजेर्यंत एक ही आंदोलक मैदानात दाखल झाला नाही. दुपारी १२नंतर २५ ते ३० जणांची मराठा आंदोलक आझाद मैदानात दाखल झाले.

सरकारविरोधी घोषणाबाजी

हे आंदोलक मैदानात दाखल झाले. हे सर्व जण एक मराठा लाख मराठा, सरकार आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ, कोण बोलते देणार घेतल्याशिवाय राहत नाही, या सरकारचे करायचे काय खाली डोकेवर पाय,

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी

“मुंबईत हे पहिले मराठ्यांचे जेल भरो आंदोलन आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा मराठा तरुणांवर जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सरकारने ते तात्काळ मागे घ्यावे, ज्या तरुणी आरक्षणासाठी आत्महत्या केली. त्यांना सरकारने ५० लाख रुपये तर, जखमींना १० लाख रुपयाची मदत देण्यात यावी. तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा मराठा आंदोलक जेलभरो आंदोलन करणार असल्याचे सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक केदार सुर्यवांशी यांनी एच. डब्ल्युशी बोलताना सांगितले.”

Related posts

मुंबईत वाचक जागराला सुरूवात

News Desk

अंबरनाथमध्ये शाळेच्या फिवाढी विरोधात विद्यार्थ्यांसह मनसेचं उपोषण

News Desk

केडीएमसीच्या अतिरिक्त आयुक्तांनी घेतली ८ लाखांची लाच

News Desk