HW News Marathi
राजकारण

एक्झिट पोलच्या माध्यमातून हजारो ईव्हीएम्समध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न !

नवी दिल्ली | देशातील लोकसभेचा अंतिम टप्पा पार पडताच जाहीर झालेल्या विविध वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोल्सप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “एक्झिट पोलवर माझा विश्वास नाही. या माध्यमातून हजारो ईव्हीएम्समध्ये फेरफार, घोटाळा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मी सर्व विरोधी पक्षांना असे आव्हान करते कि त्यांनी एकजुटीने, खंबीरपणे उभे राहावे. आपण ही लढाई एकत्र लढू”, असे ट्विट ममता बॅनर्जी यांनी केले आहे. ममता बॅनर्जी यांनी ट्विट करून ही प्रतिक्रिया दिली आहे.

लोकसभेचा अंतिम टप्पा पार पडल्यानंतर रविवारी (१९ मे) संध्याकाळी जाहीर झालेल्या एक्झिट पोलनुसार यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्येही एनडीएला बहुमत मिळेल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी याप्रकरणी नाराजी फक्त करत एक्झिट पोलच्या माध्यमातून हजारो ईव्हीएम्समध्ये फेरफार करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. “माझा एक्झिट पोलवर विश्वास नाही. एक्झिट पोलच्या माध्यमातून हजारो ईव्हीएम्समध्ये फेरफार करण्याची ही रणनिती आहे. या पार्श्वभूमीवर देशातील विरोधी पक्षांनी संघटीत होऊन एकजुटीने खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन मी करते. आपण ही लढाई एकत्र लढू”, अशा आशयाचे ट्विट ममता बॅनजी यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर नवाब मलिकांनी मागितली अण्णा हजारेंची माफी

News Desk

त्या भाजप उमेदवाराचे नाव ‘कुजय’ असायला हवे होते, धनंजय मुंडेंची बोचरी टीका

News Desk

Lok Sabha Elections 2019 LIVE UPDATE : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क

News Desk