HW News Marathi
राजकारण

जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात २ दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमध्ये सुरु असलेल्या दहशतवाद्यांचा कुरापती अजूनही सुरूच आहेत.जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये बुधवारी (१३ फेब्रुवारी) सकाळी झालेल्या चकमकीदरम्यान २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास भारतीय सैन्याला यश आले आहे. भारतीय सुरक्षा दलाला बडगाममध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर जवानांनी या संपूर्ण परिसराला घेरले. या परिसरात सुरु करण्यात शोधमोहिमेत जवानांनी २ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील रत्नीपोरा परिसरात मंगळवारी (१२ फेब्रुवारी) सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली. दरम्यान, भारतीय सैन्याने या संपूर्ण परिसराला घेराव घातला होता. पुलवामा जिल्ह्यातील रात्नीपोरा परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय सुरक्षा दलाला मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलाची शोधमोहीम सुरु झाली. दरम्यान, सुरक्षा दलांच्या जवानांनी हा संपूर्ण परिसर घेरल्याने दहशतवाद्यांनी गोळीबार करायला सुरुवात केली. दहशतवाद्यांच्या या गोळीबाराला सुरक्षा दलाच्या जवानांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

swarit

अशोक गेहलोत राजस्थानचे नवे मुख्यमंत्री

News Desk

मला नाव कमाविण्यापेक्षा सर्वसामान्यांचे आशीर्वाद कमवायचे आहेत !

News Desk