HW News Marathi
राजकारण

RamMandir : उद्धव ठाकरे फैजाबाद विमानतळावर दाखल

नवी दिल्ली | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे फैजाबाद विमानतळावर दाखल झाले आहेत. फैजाबाद विमानतळावरून आता ते पुढील नियोजित कार्यक्रमासाठी ‘लक्ष्मण किला’ येथे खास बुलेट प्रूफ गाडीतून रवाना होतील. या बुलेट प्रूफ गाडीमध्ये केवळ ठाकरे कुटुंबीयच असणार आहेत. उद्धव यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#LokSabhaElections2019 : सुरक्षेच्या कारणास्तव काश्मीरच्या विधानसभा निवडणुका पुढे ढकलल्या

News Desk

नितीन गडकरींनी नौदलाची माफी मागावी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी

News Desk

‘लुटो भाई लुटो…. लूट सको जितना लुटो… | धनंजय मुंडे 

swarit
राजकारण

RamMandir : अशी आहे अयोध्येतील सुरक्षा व्यवस्था

News Desk

अयोध्या | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यंदाच्या दसरा मेळाव्यात २५ नोव्हेंबरला अयोध्येच्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे आपल्या कुटुंबासह उद्धव ठाकरे अयोध्येसाठी रवाना झाले आहेत. दरम्यान, शिवसेनेचा अयोध्या दौरा आणि त्याच वेळी असणारी विश्व हिंदू परिषदेची धर्मसंसद यामुळे अयोध्येची सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आली आहे.

अयोध्येतील सुरक्षाव्यवस्थेसाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक स्तराचे १ अधिकारी, १ उप-पोलीस महानिरीक्षक, ३ वरिष्ठ पोलीस अधीक्षक, १० अपर पोलीस अधीक्षक तर २१ क्षेत्राधिकारी, १६० पोलीस अधिकारी, ७० हवालदार, पीएसीच्या ४२ आणि आरएएफच्या ५ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत, अशी माहिती येथील पोलीस प्रशासनाने दिली आहे. त्याचप्रमाणे अयोध्येत एटीएसचे कंमाडो आणि ड्रोन कॅमेरा, आरएएफ आणि दहशतवादविरोधी पथके तैनात करण्यात आली आहेत.

दरम्यान नॅशनल हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार, अयोध्येतील सुमारे ३,५०० मुस्लिम नागरिकांनी भीतीपोटी शहरातून सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. शिवसेना हा पक्ष म्हणजे एक अत्यंत कट्टर आणि उग्र अशी संघटना आहे, असा अयोध्येतील जनतेचा समज आहे. शिवसेनेचा अयोध्या दौरा आणि त्याच दिवशी असलेली विश्व हिंदू परिषदेची धर्मसंसद यामुळे अयोध्येतील जनतेमध्ये विशेषतः मुस्लिम नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related posts

राजकीय नेत्यांनी इतर क्षेत्रांमध्ये हस्तक्षेप करू नये !

News Desk

सांगली जिल्हयातील ग्रामीण भागातील एका लहान शेतकरी कुटुंबात डॉ. पतंगरावांचा जन्म

News Desk

शहा-फडणवीस भेटीत मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा ?

Gauri Tilekar