HW News Marathi
राजकारण

उध्दव ठाकरे शिवनेरीच्या पवित्र मातीचा कलश अयोध्येला नेणार

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी देशाला अयोध्येतील राम मंदिराच्या आठवण करून देण्यासाठी २४ नोव्हेंबरला अयोध्यात्या दौऱ्यावर जाणार आहेत. याआधी ठाकरे यांनी गुरुवारी (२२ नोव्हेंबर)ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या असलेल्या शिवनेरी या त्यांच्या जन्मस्थळ किल्ल्यावर जाऊन येथील माती कलशमध्ये भरून ती आयोध्येला नेणार आहेत. ढोल-ताशांच्या गजरात शिवनेरीवर ठाकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. या पवित्र स्थळाची माती राम मंदिराच्या निर्माणासाठी देणार आहेत.

उद्धव ठाकरे २४ आणि २५ नोव्हेंबरला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. तत्पूर्वी ते महाराष्ट्राचे अराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा दर्शनासाठी गुरुवारी(२२नोव्हेंबर)ला पोहचले आहेत. मुंबईसह राज्यातले अनेक शिवसैनिक अयोध्येच्या दिशेने रवाना होत आहेत. अयोध्येत जिथे हा सोहळा पार पडणार असून या ठिकाणी शिवसेना नेत्यांनी पूजा करणार आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राजन विचारे, एकनाथ शिंदे आणि विनायक राऊत यासारखे नेते यावेळी उपस्थित होते. वारकऱ्यांच्या एक गटानेही उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याला पाठिंबा दिला आहे

अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी “हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार” असा नवा नारा दिला. तसेच महिला आघाडी आणि युवासेनेला अयोध्येत येऊ नये असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. राम मंदिर बांधा नाही तर हा फक्त चुनावी चुमला होता हे मान्य करा, असा इशारा ठाकरे यांनी मोदी सरकारला दिला आहे. उद्धव टाकरेंनी दसरा मेळाव्यात अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस पक्ष स्वतःची ओळख हरवून बसला आहे !

News Desk

भाजप कडून बलात्का-यांची पाठराखण | राज ठाकरे

News Desk

#MarathaReservation : काँग्रेस-राष्ट्रवादीने आरक्षणाचा मुद्दा चुकीच्या पध्दतीने हातळला !

News Desk