HW News Marathi
राजकारण

भाजपचा राम मंदिराचा मुद्दा हा केवळ एक जुमला | उद्धव ठाकरे

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून पुन्हा एका भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. ‘प्रत्येकाच्या खात्यामधे १५ लाख रुपये जमा केले जातील हे एक प्रकारचे खोटे आश्वासन होते. त्याचप्रमाणे राम मंदिराचा मुद्दा हा देखील भाजपचा केवळ एक जुमला आहे’, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. अयोध्या राम मंदिराच्या मुद्द्यावरून राजकारण सध्या चांगलेच तापलेले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबरला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांकडून देखील अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी होताना पाहायला मिळत आहे. ‘राम मंदिराचा मुद्दा हा केवळ निवडणुकांपुरताच उचलला जातो. त्यानंतर भाजपला त्याचा विसर पडतो. मात्र, जेव्हा राम मंदिराचा मुद्दा उचलला जातो तेव्हा आपण याची खात्री करून घ्यायला हवी कि राम मंदिर खरोखरच बांधण्यात येईल’, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

प्रत्येकाच्या खात्यामधे १५ लाख रुपये जमा केले जातील, असे सरकारकडून सांगण्यात आले होते. त्या घोषणेची अंमलबजावणी अद्यापही झालेलीच नाही. तो केवळ मत मिळवण्यासाठीचा एक जुमला होता. त्याप्रमाणेच अयोध्येत राम मंदिर बांधणे हा सुद्धा भाजप सरकारसाठी केवळ एक मत मिळविण्यासाठीचा जुमला असल्याचे उध्दव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भीमा-कोरेगाव विजय दिवसाच्या निमित्ताने प्रशासनाकडून तयारीला सुरुवात

News Desk

अखेर एकनाथ शिंदे मुंबईत दाखल; देवेंद्र फडणवीसांसोबत राज्यपालांची घेणार भेट

Aprna

अरविंद सुब्रमण्यन यांचा राजीनामा

News Desk
राजकारण

विधिमंडळातील राजदंड मतदारसंघात नेण्यासाठी मला परवानगी द्या !

News Desk

मुंबई | विधीमंडळातील राजदंडाकडे जर केवळ शोभेची वस्तू म्हणून पाहण्यात येणार असेल तर मग हा मला मतदारसंघात नेऊ द्या, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. राजदंड उचलल्यानंतर सभागृह तहकूब करण्याऐवजी कामकाज सुरूच ठेवण्यात आल्याने जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना पत्र लिहून त्यांच्याकडे राजदंड मतदारसंघात नेण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली.

मराठा, धनगर, मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज विधिमंडळात मोठा गदारोळ झाला. यावेळी मुस्मील आमदाराकडून राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला गेला. यामुळे विधानसभेचे कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. तसेच मुस्लिम आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या दिशेने कागद देखील भिरकावले. काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी मुस्लिम आरक्षणावरून राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला आहे.

जितेंद्र आव्हाड नेमके काय म्हणाले ?

‘जेव्हा विधानसभेचे अध्यक्ष विधीमंडळात असतात तेव्हाच हा राजदंड असतो. ते याचे एक प्रातिनिधीक सन्मानचिन्ह असते. त्यामुळे हा राजदंड उचलल्यानंतर सभागृह तहकूब व्हायला हवी होती. मात्र आज तसे न होता राजदंड उचलल्यावरही विधीमंडळाचे कामकाज सुरूच राहिले’, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

Related posts

15 फेब्रुवारीपासून राष्ट्रवादी कॉग्रेसचा उत्तर महाराष्ट्रात हल्लाबोल

swarit

“…म्हणूनच तुमची इतकी मस्ती आणि चरबी वाढली”, संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र

Aprna

आमच्या उमेदवारांचा पराभव काँग्रेस-राष्ट्रवादीमुळेच !

News Desk