HW News Marathi
राजकारण

आम्ही इतके स्वस्त नाही, काँग्रेसने ‘त्या’ ३ जागा दिल्या नाहीत तर स्वबळावर लढणार !

आरती मोरे | कोल्हापूरमध्ये शुक्रवारी (२२ फेब्रुवारी) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची गुप्त बैठक झाली होती. या बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी हातकणंगलेसह वर्धा आणि बुलढाणा या ३ जागा सोडल्या नाहीत तर स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळाचा नारा देईल, असा निर्णय घेण्यात आल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी स्पष्ट केले आहे.

शेतकरी प्रश्नाबाबत नरेंद्र मोदी सारख्या महाकाय व्यक्तीला आम्ही गुढघे टेकायला लावले

“काँग्रेस-राष्ट्रवादीकडून गेले अनेक दिवस स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोबत घेण्याच्या नुसत्या गप्पा चालू आहेत. सहज घेण्याइतपत आम्ही स्वस्त नाही. शेतकरी प्रश्नाबाबत नरेंद्र मोदी सारख्या महाकाय व्यक्तीला आम्ही गुढघे टेकायला लावले. शेतकऱ्यांचा मुद्दा केंद्रस्थानी आणला. म्हणूनच मध्य प्रदेश सारख्या ठिकाणी भाजपचा पराभव झाला. आमचा चेहरा वापरून, आमची सोबत घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी परिवर्तन करू पाहत असेल तर मग आमच्या हक्काच्या ज्या ३ जागा आहेत त्या आम्हाला मिळायला हव्या. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीने हातकणंगलेसह वर्धा आणि बुलढाणा या दोन जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडाव्यात. तीन मतदारसंघ दिल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना मागे हटणार नाही. येत्या तीन दिवसांमध्ये जर आघाडीने याबाबतची भूमिका स्पष्ट करत स्वाभिमानीसाठी या ३ जागा सोडल्या नाहीत तर स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळाचा नारा देईल”, असे अनिल पवार यांनी एच.डब्ल्यू.मराठीशी बोलताना स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…हिंमत असेल तर लोकसभा निवडणूक लढवून दाखवा, पंकजा मुंडेंचे आव्हान

News Desk

“मुख्यमंत्री म्हणजे, आकाशाला हात लागले…”, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

Aprna

“पुढचे अडीच वर्ष ‘मविआ’ सरकार पूर्ण करेल”, संजय राऊतांचा विश्वास

Aprna