HW News Marathi
राजकारण

काँग्रेसला आघाडीसाठी विचारुन थकलो पण काँग्रेस दादच देत नाही !

नवी दिल्ली | “काँग्रेसला आघाडीसाठी विचारुन विचारुन थकलो पण काँग्रेस दादच देत नाही. त्यांच्या मनात काय आहे हे लक्षातच येत नाही”, असे वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. दिल्लीतील चांदनी चौक भागात बुधवारी (२० फेब्रुवारी) एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. काँग्रेस दुसऱ्या पक्षांना कमकुवत करीत असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी यावेळी काँग्रेसवर केला आहे. त्याचप्रमाणे दिल्लीतील सर्व जागांवर आप स्वतंत्र लढेल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली आहे.

“काँग्रेससोबत जर आमची आघाडी झाली तर दिल्लीतील सर्व जागांवर भाजपचा पराभव होईल. म्हणूनच आम्ही काँग्रेसला आघाडीसाठी तयार करण्याचा प्रयत्न करीत आहोत. मात्र, यासाठी त्यांनी नकार दिला. काँग्रेसला वारंवार विचारुन मी आता थकलो आहे. मला लक्षात येत नाही की त्यांच्या मनात काय सुरू आहे”, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी नवाब मलिक यांची नियुक्ती

News Desk

सुरेखा पुणेकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk

युद्ध नसताना जवान का शहीद होतात !

News Desk