HW News Marathi
राजकारण

अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी जमीन हस्तांतरित करा !

मीरा रोड | “अयोध्येतील राममंदिर बांधण्यासाठी सरकारने तेथील जमीन हस्तांतरित करून मंदिराची उभारणी करून आपले वचन पूर्ण केले पाहिजे, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी बुधवारी उत्तन येथे मांडली. ज्याप्रमाणे सोमनाथ मंदिराचे पुनर्निर्माण केले त्याचप्रमाणे सरकारने भूसंपादन करून राम मंदिराच्या निर्माणासाठी ती जागा सोपविली पाहिजे.

सध्या राम मंदिराच्या मुद्यावर देशभरात राजकारण सुरू आहे. मंदिराला राजकीय आणि धार्मिक स्वरूप देऊ नये, अशा शब्दात वैद्य यांनी शिवसेनाल टोला लगावला आहे. तसेच १९९४ मध्ये सर्वोच्च न्यायालयात देशाच्या महाधिवक्ता यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार सरकारने विना विलंब राम मंदिराच्या बांधकामाला गती देण्यास मदत करावी, असे देखील वैद्या यावेळी बोलले.

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यकारिणीच्या तीन दिवसीय बैठकीला मीरा-भाईंदर येथील केशव सृष्टी येथे बुधवारी सुरुवात झाली आहे. २ नोव्हेंबरपर्यंत चालणार्‍या या बैठकीत विविध राष्ट्रीय मुद्दे, नवीन शिक्षा निती, संघाचे कार्य, योजनांचा आढावा, राज्यांमधील घडामोडी, सद्यस्थिती यावर चर्चा होणार आहे. तसेच बैठकीसाठी ३५० प्रतिनिधी आले आहेत. संघाच्या विस्ताराचा, संघ कुठे कमी आहे, त्या ठिकाणी संघ कसा वाढवायचा, यावर चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्री महादेव जानकर यांना दिलासा

News Desk

मंत्रिमंडळाचा विस्तार दसऱ्यानंतर करा !

swarit

तब्बल २३ तासांनी लागला निकाल, भाजपचे डावखरे विजयी

News Desk