HW News Marathi
राजकारण

राष्ट्रपतींना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला तेव्हा मोदींनी काय केले ?

मुंबई | “निवडणुकीच्या राजकारणात जाती-धर्माच्या नावावर मतदारांना आवाहन करण्याचा संघ परिवार व भाजपची फार जुनी सवय आहे. २०१४ प्रमाणे यावेळी देखील नरेंद्र मोदी आणि भाजपने तेच करायचे ठरविलेले दिसते. मोदी यांनी अकलुजच्या भाषणात आपण मागासवर्गीय असल्यामुळे काँग्रेस टीका करत असल्याचे म्हटले आहे. हा त्याचाच पुरावा आहे”, असे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी म्हटले आहे. दरम्यान, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता देशातील सर्वच राजकीय पक्ष जातीच्या राजकारणाचा आधार घेत एकमेकांवर निशाणा साधत आहेत.

“राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांच्या जातीबाबत बोलल्याने संघ परिवाराच्या नाकाला फारच मिरच्या झोंबल्या पण याच राष्ट्रपतींची उमेदवारी जाहीर करताना मात्र भाजपच्या तडीपार अध्यक्षांनी स्वतः रामनाथ कोविंद यांची जात जाहीर केली होती, हे अजून कोणीही विसरलेले नाही. पण हेच राष्ट्रपती जेव्हा वेगवेगळ्या मंदिरात जात होते, तेव्हा तिथले पुजारी त्यांना देवळाच्या गाभाऱ्यात प्रवेश करु देत नव्हते, तेव्हा संघ परिवार आणि भाजपने ते कसे चालू दिले. आज दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांचा पुळका आलेल्या पंतप्रधानांनी तेव्हा काय केले ?” असा सवाल महाजन यांनी विचारला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ही लोकशाही आहे, तुम्ही म्हणालात म्हणून कोणीही दुर्योधन होत नाही !

News Desk

आता गणेशोत्सव, नवरात्रीही उत्साहात साजरे करा! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Manasi Devkar

महाआघाडीमध्ये आता चंद्रबाबू नायडू यांचा समावेश

Gauri Tilekar