HW News Marathi
राजकारण

…तर मग तुम्हाला माझ्याविरोधात आघाडी करण्याची गरज काय ?

नवी दिल्ली | “मी पंतप्रधान म्हणून अपयशी ठरलो असेन तर मग तुम्हाला माझ्याविरोधात आघाडी करण्याची गरज काय ?”, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना केला आहे. पंतप्रधान मोदी सध्या तामिळनाडू दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते. मोदींनी यावेळी पुन्हा एकदा विरोधकांची महाआघाडी म्हणजे महाभेसळ असल्याचे म्हटले आहे. “महाआघाडीचा घराणेशाही पुढे नेण्याचा प्रयत्न तामिळनाडूसह देशातील जनता यशस्वी होऊ देणार नाही”, असा विश्वास देखील मोदींनी यावेळी व्यक्त केला आहे.

पंतप्रधान मोदींनी यावेळी राफेल मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसवर जोरदार टीका केली. “काँग्रेसने संरक्षण क्षेत्रात अनेक घोटाळे केले, आपल्या जवळच्या लोकांना कंत्राटे दिली, जमिनीपासून आकाशापर्यंत भ्रष्टाचार केला. मात्र भाजपचा कारभार हा भ्रष्टाचारमुक्त आहे. काँग्रेसच्या भ्रष्ट्राचाराचा परिणाम देशाच्या संरक्षण सामर्थ्यावर झाला”, असा आरोप देखील यावेळी मोदींनी केला.मात्र मोदींनी यावेळी राज्यातील सत्ताधारी पक्ष अण्णाद्रमुकवर टीका करणे कटाक्षाने टाळले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#PulwamaAttack : सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीच गैरहजर | शरद पवार

News Desk

रवी राणांबाबत ठोस भूमिका घ्या अन्यथा… बच्चू कडूंचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना इशारा

Chetan Kirdat

नगर, पुण्यासह राज्यातील आणखी अनेक भागांत मुसळधार पाऊस

News Desk