HW News Marathi
राजकारण

राष्ट्रगीत असताना वंदे मातरम् कशाला ?

परभणी “राष्ट्रगीत असताना वंदे मातरम् कशाला”? असा सवाल आंबेडकर यांनी उठवला आहे. एमआयएम पक्षांनंतर आता भारिप महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी वंदे मातरमला विरोध केला आहे. वंदे मातरमला फक्त एमआयएम नव्हे तर आमचा ही विरोध आहे. “वंदे मातरम् हे राष्ट्रगीत नाही, त्यामुळे त्यावर सक्ती करता कामा नये”, असे ही आंबेडकर यांनी म्हटले.

“जन-गण-मन असताना आणखी पर्यायी गीत कशाला हवे? भाजपचा राष्ट्रगीतावर विश्वास नाही का” ? असा प्रश्न आंबेडरांनी उपस्थित केला.” परभणीमध्ये पत्रकारांशी आंबेडकर यांनी सवांद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

काँग्रेस पक्षला आमच्याशी मैत्री करायची असती तर एव्हढ्यात हालचाल झाली असती.” दोन महिन्यातून दिल्लीहून कोणतेच संकेत आले नाहीत, याचा अर्थ काँग्रेसला मी आणि वंचित बहुजन चालत नाही,” असा होतो. लोकसभेच्या सर्व जागा आम्ही लढणार आहोत अशी घोषणा ही आंबेडकर यांनी यावेळी केल्या आहेत. तसेच राष्ट्रवादीसोबत युती करायला आंबेडकरांनी नकार दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पंतप्रधान मोदींच्या पक्षाची एक्सपायरी डेट लवकरच संपणार !

News Desk

पुढची २५ वर्षे तरी मोदींना कोणीही धक्का देऊ शकणार नाही !

News Desk

“अजित पवारांनी कोणत्या पुराव्यांच्या आधारे विधान केले, ‘ते’ सांगावे”, संभाजीराजेंचा सवाल

Aprna
मुंबई

मुंबई विमानतळावर सहा तासाचा मेगाब्लॉक

swarit

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर आज (२३ ऑक्टोबर)ला सहा तासाचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. विमानतळाच्या मुख्य आणि दुय्यम धावपट्टी (रनवे) दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी धावपट्टी सहा तास बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विमानतळाची धावपट्टी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

या दरम्यान मुंबई विमानतळावरून एकही उड्डाण होणार नाही किंवा एकही विमान विमानतळावर उतरणार नाही. यामुळे मुंबईत ये-जा करणाऱ्या प्रवाशांची गैरयोय होऊ शकते. विमानतळावरील सहा तासाच्या मेगा ब्लॉकचा परिणाम या वेळेत रोज होणाऱ्या ३०० विमान वाहतुकीवर होणार आहे. विमानतळावर रोज सुमारे १ हजार विमानांची वाहतुक होते. विमान उड्डाणांच्या वेळापत्रकात केलेला बदल, तसेच रद्द केलेली उड्डाणे आदी माहिती घेण्यासाठी प्रवाशांनी देण्यात येत आहे.

 

 

Related posts

रोटरी क्लबचा “लहान बालक हृद्यरोग शस्त्रक्रिया प्रकल्प’ कौतुकास्पद

News Desk

स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्षात्रतेज आणि राष्ट्रासाठी प्रेरणा पुरुष !

News Desk

उद्धव ठाकरें कोण म्हणाल उद्धट ?

News Desk