HW News Marathi
राजकारण

शरद पवार नक्षल्यांची भाषा का बोलत आहेत ?

मुंबई । “गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्यानंतर राष्ट्रवादीचे काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचे विधान अतिशय धक्कादायक असून ते नक्षल्यांचे बोल ते का बोलत आहेत”, असा सवाल राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी उपस्थित केला आहे. “गडचिरोलीतील हल्ला हा निषेधार्हच आहे. त्याचा करावा तितका निषेध कमी आहे. पण, लगेच शरद पवार गृहखातं, मुख्यमंत्री, जनाची नाही तर मनाची अशा आशयाचे प्रश्न उपस्थित करीत आहेत. जनाची नाही तर मनाची हे वाक्य पवारांच्या तोंडी तरी शोभते काय ?”, असा सवाल तावडे यांनी केला आहे.
“१२ मार्चला १९९३ मध्ये जेव्हा बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी मुंबई हादरली होती, तेव्हा विधिमंडळात त्यांचा राजीनामा मागण्यात आला होता. छत्तीसगडमध्ये अलिकडेच एक नक्षलवादी हल्ला झाला आणि त्यात भाजपाचे आमदार त्या हल्ल्यात मारले गेले. त्यावेळी हेच पवार गप्प का होते ? केवळ छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री होते म्हणून ? काँग्रेसने देशद्रोहाचे कलम मागे घेण्याचे जे आश्वासन दिले आहे, त्या निर्णयाला आपण याचसाठी का समर्थन दिले ?”, असा प्रश्नही विनोद तावडे यांनी उपस्थित केला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल

News Desk

#MarathaReservation : मराठा आरक्षणाला पुन्हा आव्हान, रिट याचिका दाखल

News Desk

पाकिस्तानवरील हल्ला हे ‘काम’ नसून कर्तव्य आहे, हे आमच्या राजकारण्यांना कधी समजणार ?

News Desk