HW News Marathi
क्रीडा

बीसीसीआयकडून हार्दिक पंड्या-लोकेश राहुलवर निलंबनाची कारवाई

मुंबई | बीसीसीआयने पुन्हा एकदा आपण किती शिस्तबद्ध आहोत हे सिद्ध केले आहे. टीम इंडियाच्या अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि सलामीवीर फलंदाज केएल राहुल यांना ऑस्ट्रेलिया विरूध्दच्या पहिल्या वनडे सामन्यातून वगळण्यात आले आहे. ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये महिलांविरोधात आक्षेपार्ह टीका केल्यामुळे या दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणाची बीसीसीआयचे न्यायालय नियुक्त प्रशासकिय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी गंभीर दखल घेतली होती. याप्रकरणी दोघांवरही दोन सामन्यांची बंदी घालण्याविषयी विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले होते. यानंतर या दोघांनीही उद्या (१२ जानेवारी) ऑस्ट्रेलियात होण्याऱ्या पहिल्या समान्यातून वगळण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विश्वविजेत्या महिला क्रिकेटपटूंचे अभिनंदन

Aprna

आचरेकरांनी दिलेला दम सचिन यांच्या कायम लक्षात राहिला

News Desk

क्रिकेटर आयुष झिमरेने घेतली आठवलेंची भेट

News Desk